प्रकरण-10 भारतीय इतिहासातील नवे पर्व
प्रास्ताविक-
मौर्य सम्राट साम्राज्याच्या विघटनानंतर स्थानिक राजसत्तांच्या महत्वाकांक्षा बळावल्या.
प्रादेशिक राज्यांच्या उदयाला सुरुवात झाली. त्यातून शुंग, सातवाहन या राजकीय सत्तांचा उदय झाला.
याच सुमारास ग्रीक, शक, पल्लव, कुशाण या परकीयांची आक्रमणे सुरू झाली.
प्रादेशिक राज्यांच्या उदयाचा काळ हा राजकीय आणि सामाजिक संक्रमणाचाही काळ होता.
कुशाण साम्राज्याच्या अवशेषातून गुप्त साम्राज्य उदयाला आले. त्यांनी कुशाण तसेच सातवाहनांच्या प्रदेशावर आपले साम्राज्य उभारले.
मध्य आशियातील भटक्या टोळ्या-
सिकंदराच्या मृत्यूनंतर त्यांनी नेमलेल्या सत्रपांनी,आपले स्वतंत्र राज्य प्रस्थापित केली.
वायव्येकडील ग्रीक राज्यांच्या उतरत्या काळातच मध्य आशियातील भटक्या टोळ्यांनी बॅक्ट्रियावर आक्रमणे केली.
इसवीसन पूर्व दुसऱ्या शतकाच्या उत्तरार्धात पहलव (पार्थियन) आणि शक (स्कीथियन) त्यांनी हल्ले केले.
मध्य आशियातील शकांना चीनमधून आलेल्या युएची टोळ्यांनी तेथून स्थलांतर करण्यास भाग पाडले.
युएची हे पशुपालक होते. या भटक्या लोकांनी स्थानिक राजांवर त्यांच्या युद्ध कौशल्याचा जोरावर वर्चस्व मिळवले आणि त्याची तेथे स्वतःची राज्य प्रस्थापित केले.
प्रश्न- मध्य आशियातील भटक्या टोळ्यांची माहिती लिहा. ( थोडक्यात उत्तर लिहा)
वायव्येकडील ‘बॅक्ट्रिया’ या ग्रीक राज्यावर भटक्या टोळ्यांनी आक्रमणे केली.
मध्य अशियातील पहलव आणि शकांनी उत्तर भारतावर आक्रमण केले.
चीनमधील युएची टोळ्यांनी शकांना मध्य आशियातून हद्दपार केले.
या भटक्या टोळ्यांनी त्यांच्या युद्ध कौशल्याच्या जोरावर स्थानिक राजांना पराभूत करून तेथे स्वतःचे राज्य स्थापन केली.
इंडो-ग्रीक, शक, कुशाण -
इंडो-ग्रीक - ( संकल्पना स्पष्ट करा)
वायव्य भारतातील सत्रपींंना ‘इंडो-ग्रीक’ असे म्हटले जाते.
भारतीय परंपरेत त्यांचा उल्लेख ‘यवन’ असा केला जातो.
ग्रीक सम्राट सिकंदराच्या मृत्यूनंतर त्याने नेमलेल्या सत्रपांनी आपापली स्वतंत्र राज्य प्रस्थापित केली होती.
प्रश्न- इंडो-ग्रीकांची उद्दिष्टे लिहा. (थोडक्यात उत्तर लिहा)
वायव्य भारतातील ग्रीक सत्रपांना असे म्हटले जाते. त्यांची उद्दिष्टे-
भूमध्य सागराच्या परिसरात आपले वर्चस्व प्रस्थापित करणे.
पश्चिम व मध्य आशियातील व्यापारावर आपली पकड दृढ करणे, हे त्यांचे उद्देश होते. सेल्युकस निकेटर हा वायव्येकडील बॅक्ट्रिया प्रांतातील इंडो-ग्रीक राजा होता.
प्रश्न- भारताच्या वायव्य भागात दोन स्वतंत्र इंडो-ग्रीकांचे प्रस्थापित झाली होती. (सकारण स्पष्ट करा)
बॅक्ट्रियाचा राजा डिमीट्रस याने इसवीसनपूर्व १८० मध्ये भारतावर आक्रमण करून तक्षशिला जिंकले.
त्याची राजधानी साकल (सियालकोट) येथे होती.
याच सुमारास युक्रेटायडीस त्याने आपले स्वतंत्र राज्य प्रस्थापित केले. त्याची राजधानी तक्षशिला होती.
अशाप्रकारे भारताच्या वायव्य भागात दोन स्वतंत्र इंडो-ग्रीक राज्य प्रस्थापित झाली.
डिमिट्रस आणि युक्रेटायडिस यांनी स्थापन केलेल्या या दोन्ही शाखांचे मिळून ४० राजे होऊन गेले.
इंडो-ग्रीकांचा इतिहास हा प्रामुख्याने त्यांच्या नाण्यांवरून समजतो.
नाण्यांवरील ठसे, मजकूर, राजांचे चित्र, देवतांचे चित्र या नाविन्यपूर्ण गोष्टी ही त्यांची भारतीय नाणकपरंपरेला मिळालेली देणगी आहे.
शक- (संकल्पना स्पष्ट करा)
(प्रश्न- भारतातील शक राज्याच्या स्थापनेचा वृत्तांत लिहा. थोडक्यात उत्तरे लिहा.)
मध्य आशियातील स्किथियन भटक्या टोळ्यांना भारतात ‘शक’ असे म्हटले जात होते.
म्हणजेच शक हे मध्य आशियातून आले. त्यांनी बॅक्ट्रियातील इंडो-ग्रीकांना हुसकावून लावून आपले राज्य प्रस्थापित केले.
त्यांच्या वसतिस्थानास ‘शकस्थान’ (शिस्तान) असे म्हटले जात होते.
कुशाणांनी त्यांना पंजाबातून हुसकावून लावल्यानंतर पश्चिम भारतात त्यांनी स्थलांतर केले आणि तेथेच त्यांची अनेक राज्य स्थापन केली.
भारतातील पहिला शक राजा म्हणजे ‘मोएस’ उर्फ ‘मोग’.
त्याने गांधार आणि पंजाब हे प्रदेश जिंकून राज्य स्थापन केले.
त्याच्यानंतर आलेल्या शक राजांच्या दुर्बलतेमुळे पहलव राजा गोंडोफर्नेसने त्याचा पराभव करून भारतात आपली सत्ता निर्माण केली.
प्रश्न- शकांची राज्यपद्धती विशद करा. (थोडक्यात उत्तर लिहा)
पंजाबमधील राज्य नाहीसे झाल्यानंतर पश्चिम भारतात शकांची अनेक राज्य स्थापन झाली.
शकांनी आपली राज्यपद्धती इराणमधील ‘अखमोनिय’ व ‘सेल्युकीड’ पद्धतीनुसार स्थापन केली.
त्याअंतर्गत त्यांनी सत्रपांना पुरेशी स्वायत्तता दिली.
अखमोनिया व सेल्युकिड - (संकल्पना स्पष्ट करा)
शकांनी आपली राज्यपद्धती इराणमधील राज्यपद्धती म्हणजेच ‘अखमोनिय’ व ‘सेल्युकीड’ पद्धतीनुसार केली.
त्यात राज्याची प्रांतात - सत्रपीमध्ये विभागणी केली जात असे.
प्रत्येक सत्रपीवर महाक्षत्रप हा लष्करी अधिकारी नेमला जात असे.
प्रत्येक सत्रपीची उपविभागणी करून, त्याची जबाबदारी सत्रपकडे सोपवली जात असे.
प्रश्न- शक राजवटीत पुरेशी स्वायत्तता होती. (सकारण स्पष्ट करा)
शकांनी आपल्या राज्याची विभागणी सत्रपींमध्ये (प्रांत) केली होती.
प्रत्येक सत्रपीवर (म्हणजे प्रांतावर) महाक्षत्रप हा लष्करी अधिकारी नेमला जात असे.
या सत्रपींची (म्हणजे प्रांताची) उपविभागणी करून त्यावर प्रत्येकी एक सत्रप नेमला जाई.
या सत्रपांना आपले शिलालेख कोरण्याची तसेच नाणी पाडण्याची परवानगी होती. त्यावरून त्यांना पुरेशी स्वायत्तता होती असे दिसते.
कुशाण - (संकल्पना स्पष्ट करा)
(प्रश्न- कुशाण सत्तेच्या स्थापनेचा वृत्तांत लिहा. थोडक्यात उत्तर लिहा.)
मध्य आशियातील या भटक्या टोळीने बॅक्ट्रियात आल्यानंतर ग्रीकांच्या संस्कृतीचा अंगीकार केला.
शकांना दक्षिणेकडे हुसकावल्यानंतर कुजूल कडफीसीस या कुशाण प्रमुखाच्या नेतृत्वाखाली युएची टोळ्या एकत्र आल्या.
त्याने त्यांना हिंदुकुश पर्वतातून वायव्य भारतात आणले. त्याने बॅक्ट्रियाचे राज्य काबीज केले आणि स्वतःला बॅक्ट्रियाचा राजा घोषित केले.
पुढे कुशानांनी भारतात साम्राज्य प्रस्थापित केले आणि भारतीय संस्कृती आत्मसात केली.
भारतीय साहित्यामध्ये कुषाणांचा उल्लेख ‘तूखार’ किंवा ‘तुषार’ असा केला जातो.
कुशाण साम्राज्य -
प्रश्न- कुशाण राजे स्वतःला ‘देवपुत्र’ असे म्हणवत असत. ( सकारण स्पष्ट करा)
कुषाणांनी छोटी-छोटी राज्य जिंकल्यानंतर तेथे सत्रपी प्रस्थापित केल्या. त्यावर सत्रप (क्षत्रप) नावाचे लष्करी अधिकारी नेमले.
या सर्व क्षत्रपांमधील प्रमुख अधिकारी म्हणून राजा स्वतःला ‘राजाधिराज’ ‘महाराज’ अशी बिरुदे लावू लागला.
‘राजा’ हा ईश्वराचा अंश असतो, ही कल्पना कुशाणांच्या नाण्यांवरील लेखांमध्ये प्रथम आढळते.
कुशाणांच्या नाण्यांवरील लेखांमध्ये ‘देवपुत्र’ हा उल्लेख आढळतो. याचा अर्थ कुशाण राजे स्वतःला ‘देवपुत्र’ असे म्हणत असत.
प्रश्न- कनिष्काच्या कामगिरीचे वर्णन करा. (थोडक्यात उत्तरे लिहा)
अनेक शक राजांना पराभूत करून कनिष्काने काबुलपासून पाटलीपुत्रपर्यंत व काश्मीरपासून माळव्यापर्यंत कुशाण साम्राज्याचा विस्तार करून सम्राटपद मिळवले.
त्याने दोन वेळा चीनवर आक्रमण केले.
त्याने आपल्या विस्तीर्ण साम्राज्याच्या राज्यकारभारासाठी पेशावर आणि मथुरा अशा दोन राजधान्या स्थापन केल्या.
तसेच काश्मीरमधील कुंडलवन येथील विहारामध्ये चौथी बौद्ध धर्मपरिषद आयोजित केली होती.
प्रश्न- कुशाण सत्तेचा ऱ्हास सुरू झाला.
कुशाणांचा शेवटचा राजा वासुदेव याच्या नावावरूनच कुशाणांनी भारतीय संस्कृती आत्मसात केली होती, हे लक्षात येते.
त्याच्या कारकीर्दीत कुशाणांचा ऱ्हास सुरू झाला.
कुशाण साम्राज्याचे तुकडे पडून ठिकठिकाणचे सत्रप स्वतंत्र झाले.
कुशाणांची सत्ता पंजाब व गांधार या प्रदेशात इसवी सन ४ थ्या शतकापर्यंत अस्तित्वात होती.
गुप्त साम्राज्य -
प्रश्न- गुप्त वंशाचा संस्थापक श्री गुप्त याने त्याच्या नावामागे ‘महाराज’ अशी पदवी लावलेली आढळते. (सकारण स्पष्ट करा)
इसवी सन २७५ मध्ये गुप्त घराणे सत्तेवर आले.
या घराण्याचा मूळ संस्थापक श्रीगुप्त होता. त्याच्या नावामागे ‘महाराज’ अशी पदवी लावलेली आढळते. यावरून असे लक्षात येते की तो एक मांडलिक राजा होता.
श्रीगुप्त हा छोट्या राज्याचा राजा होता. त्याने अन्य सामर्थ्यशाली सम्राटांचे मांडलिकत्व पत्करले होते. म्हणून गुप्त वंशाचा संस्थापक श्रीगुप्त याने त्याच्या नावामागे महाराज अशी पदवी लावलेली आढळते.
घटोत्कच -
श्रीगुप्ताचा मुलगा घटोत्कच यांनीही ‘महाराज’ हेच बिरुद लावलेले दिसते.
घटोत्कच हाच गुप्त साम्राज्याचा खरा संस्थापक होय.
म्हणजेच त्या काळात गुप्त राजे हे मांडलिक होते.
पहिला चंद्रगुप्त-
घटोत्कच हा गुप्त घराण्यातील एक कर्तुत्ववान राजा होऊन गेला.
पहिला चंद्रगुप्त घटत्कोच याचाच पुत्र (मुलगा) होय. गुप्त राज्याचा विस्तार वाढवून त्याचे साम्राज्यात रूपांतर करण्याचे श्रेय पहिला चंद्रगुप्त याच्याकडे जाते.
त्याच्या नावाआधी जोडलेल्या ‘महाराजाधिराज’ या पदवीने गुप्त राजांच्या वाढलेल्या प्रतिष्ठेची कल्पना येते.
पहिल्या चंद्रगुप्ताने नेपाळनजीकच्या लिच्छवी कुळातील कुमारदेवी हिच्याशी विवाह केला.
हा विवाह गुप्त राजघराण्याला राजकीयदृष्ट्या फायदेशीर ठरला.
चंद्रगुप्ताने पाडलेल्या एका नाण्यावर चंद्रगुप्त आणि कुमारदेवी यांची नावे व चित्र कोरलेले आहे. त्यावरून या विवाहास विशेष महत्त्व प्राप्त झाल्याचे दिसते.
चंद्रगुप्ताची सत्ता मगध, साकेत (अयोध्या) आणि प्रयाग या प्रदेशांमध्ये पसरलेली होती.
त्यानंतरच्या काळात गुप्त घराण्यात होऊन गेलेला प्रतिभावंत, पराक्रमी, कल्याणकारी राजा म्हणजे समुद्रगुप्त होय.
समुद्रगुप्त-
गुप्त साम्राज्य चौफेर वाढविण्याचे महान कार्य चंद्रगुप्ताच्या मुलाने म्हणजे समुद्रगुप्ताने केले.
पिता चंद्रगुप्त त्याच्याबरोबर समुद्रगुप्तास विविध मोहिमांवर जाण्याची संधी मिळाल्याने त्याला उत्कृष्ट प्रशिक्षण मिळू शकले.स्वाभाविकपणेच तो राज्याचा वारस ठरला.
नाग राजांचा पराभव करून त्याने गंगेच्या विस्तीर्ण खोर्यात आपले राज्य स्थापन केले.
दक्षिणेकडे साम्राज्यविस्तार करण्याची योजना त्यांनी आखली.
मात्र नर्मदा आणि गोदावरीच्या दरम्यान वाकाटकांचे प्रबळ राज्य होते.
त्यांच्याशी संघर्ष टाळून त्याने महाकोसल व ओरिसा यामधून मुसंडी मारून दक्षिणेस कांची पर्यंत मजल मारली.
या मोहिमेत समुद्रगुप्ताने बारा राजांचा पराभव करून त्यांना गुप्तांचे मांडलिकत्व स्विकारण्यास भाग पाडले.
हा पराक्रमी, प्रतिभावंत राजा संगीतज्ञही होता.
प्रश्न- दिग्विजयानंतर समुद्रगुप्ताने अश्वमेध यज्ञ केला. ( तुमचे मत नोंदवा)
प्राचीन भारतात चक्रवर्ती राजा आपले सामर्थ्य दाखविण्यासाठी अश्वमेध यज्ञ करायचे.
मौर्यकाळात खंडित झालेल्या परंपरेचे पुनरुज्जीवन पुष्यमित्र शुंग यांनी केले होते.
दिग्विजय करून संपूर्ण भारत एकाच सत्तेच्या अधिपत्याखाली आणावा, अशी समुद्रगुप्ताची महत्वाकांक्षा होती.
समुद्रगुप्त याने आपल्या नाण्यांवर ‘सर्वराजोच्छेत्ता’ अशी पदवी कोरली होती.त्याचा अर्थ ‘सर्व राजांची संज्ञा संपुष्टात आणणारा’ असा होतो.
समुद्रगुप्ताने आपल्या शेजारील राज्ये जिंकून घेतली. उत्तर दिग्विजयानंतर दक्षिणेकडील राज्य जिंकण्याची मोहीम त्यांनी सुरू केली.
वाकाटकांची सत्ता प्रबळ असल्याने वाकाटक राज्य वगळता दक्षिणेत कांचीपर्यंतचा प्रदेश आपल्या अधिपत्याखाली आणला.
जिंकलेल्या प्रदेशांपलीकडील राजांना मांडलिक बनवले. त्यांना आपले सार्वभौमत्व मान्य करायला लावून त्यांच्याकडून खंडणी वसूल केली.
समुद्रगुप्ताची ही कृती साम्राज्यवादाची प्रवृत्ती दर्शवते. स्वतःच्या आणि स्वतःच्या राज्याच्या गौरवासाठी अशीकमाछघ तळ"२⁷ आक्रमक कृती केली जाते.
आधुनिक काळात सर्व जर्मन भाषिकांना एकसंध करण्याच्या उद्देशाने हिटलरने शेजारील राष्ट्रांवर आक्रमण करून ती काबीज केली.
साम्राज्यविस्तारवादाची ही प्रवृत्ती मानवजातीवरचे मोठे संकट आहे. त्यातून मनुष्य संभार आणि संपत्तीचा विनाश घडतो.
दुसरा चंद्रगुप्त
दुसरा चंद्रगुप्त याने शकांचा पराभव केला.
शकांचा पराभव करून गादीवर आल्यानंतर ‘विक्रमादित्य’ हे बिरूद दुसरा चंद्रगुप्त यांनी धारण केले.
त्याने पश्चिमेकडील माळवा, गुजरात व काठेवाड या प्रदेशांमध्ये आपली सत्ता प्रस्थापित केली.
त्यामुळे पश्चिमेकडची बंदरे ही गुप्तांच्या वर्चस्वाखाली आली आणि पश्चिमेकडचा व्यापारात गुप्तांचा प्रवेश झाला.
त्यानंतर चंद्रगुप्ताने हिंदुकुश ओलांडून वायव्येकडील प्रदेशही आपल्या सत्तेखाली आणला.
अशा रीतीने संपूर्ण उत्तर भारतात त्याने सार्वभौम राज्य स्थापन केले.
चंद्रगुप्ताने आपली मुलगी प्रभावती हिचा विवाह दक्षिणेतील वाकाटक राजा दुसरा रुद्रसेन यांच्याशी करून दिला आणि वाकाटकांची मैत्रीपूर्ण नाते निर्माण केले.
नवरत्ने - (संकल्पना स्पष्ट करा)
दुसरा चंद्रगुप्त हा पित्याप्रमाणे विद्वानांचा आश्रयदाता आणि विद्या व कला यांचा भोक्ता होता.
त्याच्या दरबारात नवरत्ने होती, असे म्हणतात. त्याच्या दरबारातील नऊ विद्वानांना असे म्हणतात.
ही नवरत्ने म्हणजेच - धन्वंतरी ( वैद्य), क्षपणाक (फलज्योतिषी), अमरसिह (कोशकार), शंकु (शिल्पज्ञ), वेतालभट्ट (मांत्रिक),घटकर्पूर (लेखक), कालिदास (महाकवी), वराहमिहीर (खगोल शास्त्रज्ञ),वररुची (वैय्याकरणी) ही त्या नवरत्नांची नावे होती.
कुमारगुप्त -
दुसऱ्या चंद्रगुप्ताचा मुलगा कुमारगुप्त याच्या काळात मध्य अशियातील हुणांनी भारतावर आक्रमणे सुरू केली.
कुमारगुप्ताने हूणांचे आक्रमण थोपवून धरले.
कुमारगुप्तानंतरचे राजे आपल्या राज्याचे रक्षण करण्यास असमर्थ ठरले.
शेवटी त्यांचे राज्य आणि छोट्या राज्यांमध्ये विघटित झाले.
गुप्तकालीन राज्यव्यवस्था व लोकजीवन
गुप्त काळ हा अभिजात संस्कृतीचा काळ मानला जातो.
गुप्तकाळात राजा हा प्रशासनाचा केंद्रबिंदु असे.
गुप्त प्रशासन हे विकेंद्रित होते. स्थानिक पातळीवरच अनेक निर्णय घेतले जात.
राजपुत्र, अमात्य आणि सल्लागार राजाला मदत करत. राजपुत्र कित्येक वेळा प्रांताचे प्रांतपाल म्हणून काम पाहत असत.
प्रांतपाल -
गुप्त राज्यव्यवस्थेत राज्याची विभागणी प्रांतात केली जात असे.
त्याच्या प्रशासकाचे पदनाम प्रांतपाल होते.
राजपुत्राची प्रांतीय अधिकारी म्हणून नेमणूक करताना त्याचे पदनाम कुमारामात्य असे.
विषयपती -
उत्तर राज्यव्यवस्थेत प्रत्येक प्रांताचे उपविभाग केले जात असत.
उपविभाग यांना विषय असे म्हटले जाई. त्या विषयावर स्वतंत्र प्रशासक नेमला जात असे. उपविभाग अधिकार्याचे पदनाम विषयपती असे असत.
आयुक्तक -
गुप्त राज्यव्यवस्थेत प्रांताच्या उपविभागाची विभागणी जिल्ह्यात केली जात असे.
जिल्हाधिकार्याचे पदनाम आयुक्तक असे.
शेतीच्या अर्थव्यवस्थेची पुनर्रचना -
गुप्तकालीन राजांनी शेतीचा अर्थव्यवस्थेची पुनर्रचना करण्याचे प्रयत्न केले.
स्थानिक लोकांना शेत जमिनी कसायला देण्यावर त्यांचा भर होता.
धार्मिक आणि शैक्षणिक संस्थांना जमिनी दिल्या गेल्या.
करमुक्त असत. या जमिनींना अग्रहार असे म्हटले जाई.
प्रश्न-गुप्तकाळात स्थानिक जमीनदारांच्या हाती सत्ता केंद्रित होऊ लागली. (सकारण स्पष्ट करा)
गुप्त राज्यकर्त्यांनी लष्करी व नागरी सेवेसाठी रोख पगार देण्याऐवजी इनामी जमिनी देण्याची पद्धत सुरू केली.
इनामी जमिनी या करमुक्त होत्या. राज्याचे उत्पन्न कमी होत जाऊन राजसत्ता आर्थिकदृष्ट्या दुर्बल होत गेली.
त्याचे वैशिष्ट्य असलेल्या सरंजामी पद्धतीचे मूळ इथे दिसू लागतात.
या गोष्टीमुळे राजा हे सत्तेचे केंद्र न राहता सत्तेचे विकेंद्रीकरण होऊन स्थानिक जमीनदारांच्या हाती सत्ता केंद्रित होऊ लागली.
युआन श्वांग या या चिनी प्रवाशाच्या वृत्तानुसार गुप्त साम्राज्यातील वायव्येकडील प्रदेशात ऊस व गहू ही पिके घेतली जात असत.
मगध व त्याच्या पूर्वेकडे भातशेती केली जात असे.
प्रश्न- गुप्तकाळातील कापड उद्योगाची माहिती लिहा.
कापूस मोठ्या प्रमाणात उत्पादित होत असल्याने कापड उद्योग अस्तित्वात होता.
त्यापासून विविध प्रकारचे कापड तयार केले जात असे.
क्षौम, चित्रपट्ट, दुकुल, पुलकबंध, पुष्पपट्ट, अंशूक अशा विविध प्रकारच्या कापडांना देशी-विदेशी बाजारात मोठी मागणी होती. परदेशातही निर्यात केली जात असे.
खनिजे, प्राणी व वनस्पती इत्यादी व्यापारी संपत्तीचे स्रोत होते.
प्राणी आणि वनस्पती हा गुप्तकाळात व्यापारी संपत्तीचा स्रोत होता.
त्याचबरोबर या काळात कारागिरांची गुणवत्ता उंचावली होती,असे दिसते.
सुवर्णकारांनी घडवलेली गुप्तकालीन सुवर्ण नाणी ही त्याचा उत्तम नमुना आहेत.
निगम, श्रेणी आणि गण अशा संघटना व्यापाऱ्यांनी व उद्योगपतींनी स्थापन केल्या होत्या.
साहित्यनिर्मिती--
प्रश्न- गुप्तकालीन साहित्यनिर्मितीची माहिती लिहा. (थोडक्यात उत्तरे लिहा.)
गुप्तकाळापर्यंत अनेक परकीय जमाती आक्रमणाच्या निमित्ताने येऊन भारतात स्थायिक झाल्या होत्या. त्यांना समाजव्यवस्थेत सामावून घेण्यात आले.
‘नारदस्मृती’ आणि ‘याज्ञवल्क्यस्मृती’ यासारख्या स्मृतिग्रंथांची निर्मिती या काळात झाली. या ग्रंथांमध्ये त्या अनुषंगाने झालेल्या समाजरचनेचे वर्णन आढळते.
कालिदासाने ‘शाकुंतल’ हे नाटक या काळात लिहिले. राज्यकर्त्यांनी संस्कृत भाषेला राजाश्रय दिल्याने अनेक विषयांवर संस्कृत भाषेत ग्रंथनिर्मिती झाली.
शिल्पकला-
भारतीय मूर्ती विज्ञानाचा पाया काळात रचला गेला.
मानवी आकृती हा गुप्तकाळातील शिल्पकलेचा केंद्रबिंदू होता.
मानवी शिल्पे आणि देवी-देवतांच्या मूर्ती ह्या काळात घडवल्या गेल्या.
सारनाथ, देवगड अजिंठा अशा अनेक ठिकाणी या काळातील शिल्पे आढळतात.
या काळात हिंदू बौद्ध जैन धर्माच्या मूर्ती घडवल्या गेल्या. विशेष म्हणजे प्रस्तर व धातू यांच्याबरोबरच मातीचा उपयोग मूर्ती बनवण्यासाठी या काळात केला जात असे.
गांधार शैलीत दिसणारा ग्रीक शैलीचा प्रभाव गुप्तकाळातील शिल्पकलेत दिसत नाही.
स्थापत्यकला-
प्रश्न- गुप्तकालीन स्थापत्यकलेचा विकास विशद करा. (थोडक्यात उत्तरे लिहा.)
भारतीय मंदिर स्थापत्याचा पाया गुप्तकाळात घातला गेला.
मंदिराच्या बांधकामात घडीव दगडांचा वापर करण्याची सुरुवात गुप्तकाळात झाली.
सांची, घुमरा, देवगड या ठिकाणी सुरुवातीच्या मंदिरांचे अवशेष सापडतात.
धातुविज्ञान-
प्रश्न- गुप्तकाळातील धातुविज्ञानाची माहिती लिहा. (थोडक्यात उत्तरे लिहा.)
गुप्तकाळात धातूंचे मिश्रण व ओतकाम यामध्ये लक्षणीय प्रगती झाली होती.
दिल्लीतील मेहरोली येथील लोहस्तंभ कित्येक शतके न गंजता राहिला आहे, ही बाब त्याची साक्ष देते.
यावरून गुप्तकाळातील धातुविज्ञान अत्यंत प्रगत होते, हे लक्षात येते.
वर्धन साम्राज्य - (टीप लिहा)
पुष्यभूती-
गुप्त साम्राज्याच्या पडत्या काळात पुष्यभूती यांनी उत्तर भारतातील स्थानेश्वर (ठाणेसर) या ठिकाणी वर्धन राजघराण्याची सत्ता स्थापन केली.
याठिकाणी वर्धन’, गंगा यमुना दुआबात ‘मौखारी’, सौराष्ट्र मध्ये ‘मैत्रक’ इत्यादी वंशांचा उदय झाला.
प्रभाकरवर्धन-
प्रभाकरवर्धनाच्या राज्यारोहणापासून वर्धन घराणे प्रभावी बनले.
‘परमाभट्टारक महाराजाधिराज’ हे सार्वभौमत्वाचे बिरूद त्याने धारण केले होते.
हर्षवर्धन-
वर्धन घराण्याचा सर्वात प्रभावी राजा म्हणजे हर्षवर्धन होय. साम्राज्यविस्तार नेपाळपासून नर्मदेपर्यंत व सौराष्ट्रापासून बंगालपर्यंत झालेला होता.
हर्षवर्धनाच्या मृत्यूनंतर त्याला कोणी वारस नसल्यामुळे त्याच्या राहत साम्राज्याचे तुकडे पडले व उत्तर भारतात अनेक राज्य स्वतंत्र झाली.
हर्षवर्धनाच्या दरबारी असणारा कवी बाणभट्ट यांनी लिहिलेल्या हर्षचरित या ग्रंथातून तसेच चिनी प्रवासी ह्युएन-त्संग याने लिहिलेल्या प्रवासवर्णनातून त्या काळाची बरीच माहिती मिळते.
त्याच्या कारकिर्दीत नालंदा व वल्लभी ही विद्यापीठे जगातील श्रेष्ठ विद्याकेंद्रे बनले होती.
भारतातूनच नव्हे तर चीन कोरिया जपान श्रीलंका इत्यादी देशांमधून शेकडो विद्यार्थी ज्ञानार्जनासाठी तेथे येत असत.
हर्षवर्धनाचे साम्राज्य हे प्राचीन भारतातील शेवटचे बलाढय साम्राज्य होते.
कर्कोटक साम्राज्य -
दुर्लभवर्धन -
इसवीसनाच्या ७ व्या शतकात काश्मीरमध्ये कर्कोटक घराण्याची स्थापना दुर्लभवर्धन याने केली.
त्याचे साम्राज्य नर्मदेपासून तिबेटपर्यंत पसरलेले होते.
कल्हणाच्या राजतरंगिनी या ग्रंथात कर्कोटक घराण्याची माहिती मिळते.
ललितादित्य-
दुर्लभवर्धनाचा नातू ललितादित्य (मुक्तापीड, इसवीसन ७२४-७६०) याची कारकीर्द विशेष उल्लेखनीय आहे. त्याने त्याच्या कारकीर्दीत दोनदा दिग्विजय केला.
त्यामुळे काश्मीरच्या उत्तर सीमेवरील, विशेषत: अमूदर्या नदीच्या खोऱ्यातील तूखार (तूर्क) व इतर अनेक जमातींना त्याने पळवून लावले.
उत्तरापथातील अवंतीपासून ते ईशान्येकडील प्राग्ज्योतिषपूर (आसाम) पर्यंतचा प्रदेश त्यांनी पादाक्रांत केला होता.
अवंतीच्या (कनोज) यशोवर्मा या राज्याच्या मदतीने त्याने समुद्र पार करून द्वीपांतर (श्रीलंका) केल्याचा उल्लेख कल्हनाणे केला आहे.
यावरून असे दिसते की, ललितादित्य उत्तरेला तिबेटपासून दक्षिणेला कावेरी नदीपर्यंत साम्राज्य प्रस्थापित केले असावे.
ललितादित्य हा विष्णूचा उपासक होता. त्याने मार्तंड मंदिराची निर्मिती केली.
ललितपुर नावाचे नगर वसवले होते.
झेलम नदीच्या तीरावरील आजचे लाटपूर म्हणजेच ललितपुर असावे.
हुष्कपूर (उशकुर) येथे त्याने बौद्ध विहार बांधले होते.
व्यापार, नाणी, कला, मूर्तीशास्त्र -
व्यापार-
(भारत- रोम व्यापार. (टिप लिहा.)
इसवी सनापूर्वीच्या २ रे शतक ते इसवीसनाच्या ४ थ्या शतकाचा काळ हा भारतीय इतिहासामध्ये मध्य आशियातून आलेल्या टोळ्यांच्या आगमनाचा आणि त्यांनी प्रस्थापित केलेल्या राजघराण्यांचा काळ होता आहे.
भारतात येईपर्यंत त्यांच्या मार्गातील अनेक संस्कृतीची वैशिष्ट्ये आत्मसात करत ते इथपर्यंत पोहोचले. त्यामुळे भारतातील सांस्कृतीक जीवनातही परिवर्तन घडून आले.
तत्कालीन भारतीय समाजात शेती व पशुपालन हीच उपजीविकेची प्रमुख साधने होती.
त्याचबरोबर विविध उद्योगधंदे व व्यापार यांची या काळात प्रगती झाली.
त्यामध्ये भारतीयांचा परकीयांशी आलेला संपर्क महत्त्वाचा ठरला. या काळात भारताचा समुद्री व्यापार मोठ्या प्रमाणावर वाढीस लागला.
भारतीय माल जहाजांमधून तांबड्या समुद्रापर्यंत आणि तेथून ईजिप्तमार्गे रोम येथे रवाना होत असे.
भारतातून वाघ, सिंह, माकड यासारखे प्राणी, पोपट, मोर यासारखे पक्षी, लोकर, रेशीम, सुती, कापड, हस्तिदंत, मसाल्याचे पदार्थ, चंदन, औषधी वनस्पती, हिरे, माणके व इतर चैनीच्या वस्तू निर्यात केल्या जात असत.
तसेच शिसे, तांबे, काच,सोने,चांदी, मद्य इ. वस्तू बाहेरील देशातून आयात केल्या जात असत.
या व्यापारामुळे भारतात सुवर्ण नाण्यांचा ओघ सतत येत असल्यामुळे भारतभूमी समृद्ध बनली होती.
बॅकट्रीयातील नाणी -
बॅरियातील काही नाणी आकार आणि वजन या बाबतीत ग्रीक नाण्यांसारखी होती.
त्यामधील काही नाण्यांवर घुबडाची प्रतिमा दिसते. घुबड हे ‘अथेना’ देवीचे चिन्ह आहे.
‘अथेना’ ही अथेन्सची अधिष्ठाती देवता आहे.
ग्रीक भाषेतील मजकूर असलेली इंडो-ग्रीक नाणी बॅकट्रीयात सापडली. त्यामध्ये दर्शनी बाजूवर ग्रीक भाषेत आणि मागील बाजूवर प्राकृत भाषेतील लेख असे.
प्राकृत भाषेतील लेखासाठी खारोष्टी लिपीचा वापर केलेला असे.
ग्रीकांनी सुवर्ण नाणी चलनात आणि त्यावर राजांच्या व देवदेवतांच्या आकृती कोरलेल्या होत्या.
ग्रीक तसेच रोमन नाण्यांचा मोठा प्रभाव शक, कुशाण नाण्यांवर पडलेला दिसतो.
शकांच्या नाण्यांवर खारोष्टी लिपी आढळते. या काळातील नाणी ही ग्रीक, भारतीय व इराणी संस्कृतीचा संमिश्र प्रभाव दर्शवतात.
भारतीय देवदेवतांच्या प्रतिमा नाण्यांवर दर्शवणारे कुषाण हे पहिले राजे होते.
शिवप्रतिमा असलेली तांब्याची नाणी त्यांनी चलनात आणली होती.
कला-
भारतीय ग्रीक-रोमन, इराणी आणि ग्रीक संस्कृतीचा संगम गांधार प्रदेशात झाला होता. त्यामुळे या प्रदेशाला सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले होते.
पुष्कलावती, पुरुषपूर, तक्षशिला इत्यादी नगरांमध्ये मूर्ती कलेचा विकास झाला. तिला ‘गांधार शैली’ असे नाव मिळाले.
या प्रकारातील मूर्तींचे विषय भारतीय होते, पण शैली ग्रीक होती.
गांधार शैलीच्या मूर्तीमध्ये प्राकृतिक सौंदर्याला अधिक महत्त्व होते.
बौद्ध धर्मातील महायान पंथाच्या उदयामुळे कला शैलीला प्रोत्साहन मिळाले. गौतम बुद्ध बोधीसत्व यांच्या स्मृतीबरोबर रस्त्यासाठी दान देणार्यांची पुतळेदेखील पाषाणात कोरले गेले. परंतु ही शैली वायव्येकडे घालता पुरतीच सिमित राहीली.
याच सुमारास मथुरा व वाराणसी कलाशैली विकसित झाली. त्यातील गौतम बुद्धांच्या प्रतिमा पूर्णपणे भारतीय स्वरूपाच्या होत्या.
मथुरा हे भारतीय शिल्पकलेचे महत्त्वाचे केंद्र होते. प्रतिमा- शिल्प हे मथुरा शिल्प पद्धतीचे वैशिष्ट्य आहे.
विम, तक्षम व कनिष्क, या कुशाण राजांचे पुतळे या प्रतिमा शिल्पाची नमुने आहेत.
तसेच सरस्वती विष्णू, शिव, सूर्य आणि कार्तिकेय यांच्या मूर्ती प्रथम या काळात निर्माण झाल्या.
कुशाण काळातील ही शिल्पकला भारतीय शिल्पकलेच्या इतिहासात नवनिर्मितीचा काळ दर्शवणारी होती.
या काळात तत्कालीन संपन्न समाजाचे प्रतिबिंबदेखील कलेतून उमटवण्याचा प्रयत्न केला गेला.
भारत- रोम व्यापार (महाराष्ट्रातील व्यापाराची केंद्रे)
इसवीसन पूर्व पहिल्या शतकाच्या मध्यावर लिहिलेल्या ‘The Periplus of Aerithrian Sea’ (पेरिप्लस ऑफ एरिथ्रियन सी) या ग्रंथात भारत-रोम व्यापाराचे विवरण करण्यात आले आहे.
तांबडा समुद्र आणि भारतीय किनारपट्टी यांना सागरी मार्ग बंद व्यापारात होणाऱ्या वस्तू या सर्वांचे उल्लेख आहेत.
भारत-रोम व्यापार तांबडा समुद्रमार्गे केला जात असे.
सोपारा व कल्याण या बंदरातून माल तांबड्या समुद्रापर्यंत आणला जात असे. तेथून तो रोमला पाठवला जात असे.
व्यापारी मालामध्ये कापड, मूल्यवान खडे, काळी मिरी, हस्तिदंत आणि मोर असे प्राणी भारतातून निर्यात केले जाऊ लागले.
त्याचा मोबदला सुवर्ण नाण्यांच्या रूपाने दिला जात असे. प्रवाळ आणि मद्य आयात केले जाऊ लागले.
दोन्ही बाजूंना कान असलेली मद्यकुंभाची (अँफोरा) खापरे उत्खननात सापडली आहे.
त्यांच्या तळाशी साठलेल्या द्रव्याचे परीक्षण केल्यानंतर ते मद्याचे अवशेष असल्याचे दिसते.
या व्यतिरिक्त भांड्यांचा वापर ऑलिव्ह तेल आणि गॅरम (माशांचे लोणचे) ठेवण्यासाठी होत असे.
व्यापारामुळे बाजारपेठ आणि शहरे यांच्या संख्येत वाढ झाली.
भारतातही अनेक महत्त्वाची बंदरे या काळात उदयास आली.
महाराष्ट्रात येणाऱ्या व्यापारी वस्तूंची कोठारे म्हणजे उत्पादन केंद्रे तेर, नेवासा, भोकरदन, कोंडापूर आणि सन्नती येथे होती.
सोपारा आणि कल्याण ही बंदरे भारत-रोम व्यापाराची महत्त्वाची केंद्रे होती. तेथे रोमन भांडी (Amphora) आणि तांबडी भांडी उत्खननात सापडतात.
दक्षिण भारतात व्यापाराच्या वाढीबरोबर धरणीकोट, अमरावती, नागार्जुनीकोंडा अशा विविध ठिकाणी बौद्ध केंद्रेही स्थापन झाली होती.
प्रश्न- गुप्त कालखंडात विविध क्षेत्रात प्रमाणीकरण कसे झाले ते लिहा.
मुद्दे - अ. प्रशासनाची विभागणी ब. शेतीच्या अर्थव्यवस्थेची पुनर्रचना. क. गुप्तकालीन नाणी व नाणकशास्त्रातील प्रगती.
अ. प्रशासनाची विभागणी -
गुप्तकालीन प्रशासन हे विकेंद्रित होते. स्थानिक पातळीवर अनेक निर्णय घेतले जात असत.
राजा प्रशासनाचा केंद्रबिंदू होता. राजपुत्र व सल्लागारांच्या मदतीने तो राज्यकारभार करत असे.
साम्राज्याची प्रांतात विभागणी केली जात असे. प्रांतपाल खात्याचा प्रशासक असे.
राजपुत्र प्रांतपाल म्हणून काम करीत असत, तेव्हा त्यांना ‘कुमारामात्य’ म्हटले जायचे.
प्रांताची विषय या उपविभागात विभाग केले जात असे. विषयपती हा उपविभागाचा प्रशासक असे.
विषयाची जिल्ह्यात विभागणी केली जात असे. आयुक्तक हा जिल्ह्याचा कारभार बघत असे.
ब. शेतीच्या अर्थव्यवस्थेची पुनर्रचना-
स्थानिक लोकांना शेतजमिनी कसण्यासाठी दिल्या जायच्या.
धार्मिक व शैक्षणिक संस्थांना दिल्या जाणाऱ्या जमिनी- अग्रहार- करमुक्त असायच्या.
लष्करी व नागरी सेवेसाठी रोख पगाराऐवजी इनामी जमीन देण्याची पद्धत सुरू झाली.
या प्रथेने मध्ययुगीन सरंजामी पद्धतीची सुरुवात झाली.
या पद्धतीमुळे नागरी केंद्रांचा ऱ्हास झाला. अग्रहार- दान जमिनी व इनामी जमिनी करमुक्त असल्याने महसूल कमी झाला आणि राज्याची अर्थव्यवस्था दुर्बल झाली.
क. गुप्तकालीन नाणी व नाणकशास्त्रातील प्रगती-
सुवर्णकार यांनी घडवलेली सुवर्ण नाणी उत्तम प्रतीची होती.
गुप्तकालीन नाण्यांवर राज्याच्या विविध पैलूंचे सौंदर्यपूर्ण व वास्तववादी चित्रण केले जात असे.
समुद्रगुप्ताच्या काळातील काही नाण्यांवर वीणावादन प्रतिमा आहेत. त्यावरून तो संगीततज्ञ होता, हे लक्षात येते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा