प्रजासत्ताक दिनानिमित्त.....

  • प्रजासत्ताक दिन:                        (२६ जानेवारी)

  • घटना समितीने इ.स. २६ जानेवारी १९५० ला भारताची नवी घटना संमत करून स्वीकारली आणि त्या दिवशी भारत हे सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून अस्तित्वात आले.

  •  म्हणून २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून संपन्न केला जातो.

  •  हिंदुस्थानच्या लोकप्रतिनिधींनी घटना तयार करावी व त्यास ब्रिटिश सरकारने मान्यता द्यावी, अशी मागणी इ.स. १९२२  मध्ये महात्मा गांधीजींनी केली.

  •  मार्च १९४६ मध्ये ॲटली सरकारने एक ३ सदस्यांचे शिष्टमंडळ भारतात पाठवले.

  •  त्या मंडळाने घटना परिषद बनविण्याची योजना मांडली व त्यानुसार ते अस्तित्वात आली.

  • ९ डिसेंबर १९४६ रोजी घटना समितीची पहिली बैठक संसद भवनाच्या मध्यवर्ती हॉलमध्ये झाली व स्वतंत्र भारतासाठी इच्छेनुसार घटना तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली.

  •  त्यास २०७ सभासद उपस्थित होते.

  •  या बैठकीचा प्रारंभ आचार्य कृपलानींनी सर्वात वयोवृद्ध व वरिष्ठ सभासद डॉ. सच्चिदानंद सिन्हा यांचा परिचय देऊन केला.

  •  डॉ. सिन्हांना समितीचे तात्पुरते अध्यक्ष होण्याची विनंती केली.

  •  त्यानंतर त्यांच्या अध्यक्षतेखाली घटना समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ.राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली.

  •  नोव्हेंबर १९४९ मध्ये जेव्हा घटना तयार झाली, तेव्हा ३०२ सदस्यांची नावे होती.

  •  १३ डिसेंबर १९४६ रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंनी 'भारत एक सार्वभौम स्वतंत्र व प्रजासत्ताक गणराज्य असेल, तसेच सर्व शक्ती व अधिकार जनतेद्वारा प्राप्त होतील, सर्व लोकांना न्याय, समानता व विविध क्षेत्रात स्वातंत्र्य असेल व अल्पसंख्यांक-दलित आणि मागासवर्गीय लोकांना संरक्षण मिळेल, अशी उद्दिष्टे व्यक्त केली.

  • हा ठराव २२ जानेवारी १९४७ रोजी सर्व सभासदांनी उभे राहून पास केला.

  • त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर या समितीचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले.

  •  २९ ऑगस्ट १९४७ पासून घटना पूर्ण होऊन पास होईपर्यंतची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली.

  • फेब्रुवारी १९४८ मध्ये घटनेचा कच्चा मसुदा तयार करण्यात आला व लोकांच्या सूचनेसाठी परिचालीत केला गेला.

  •  डॉ.आंबेडकरांनी घटनेचा मसुदा १४ नोव्हेंबर १९४८ रोजी घटना समितीपुढे सादर केला.

  • त्यासाठी घटना समिती ३ विराम वगळता सतत ११ महिने (१५ नोव्हेंबर १९४८ ते १७ ऑक्टोबर १९४९) बसली.

  • ७६३५ पैकी २४७३ दुरुस्त्या सूचना विचारात घेतल्या गेल्या.

  •  १७ नोव्हेंबर १९४९ रोजी डॉ.आंबेडकरांनी सभेने संमत केलेले संविधान मंजूर करावे,असा ठराव आणला.

  •  त्यावरील चर्चेत ११३ सदस्यांनी भाग घेतला.

  •  २६ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना समितीने त्यावर शिक्कामोर्तब केले.

  •  घटना समितीची शेवटची बैठक २४ जानेवारी १९४९ रोजी झाली.

  •  त्या दिवशी जन-गण-मन व वंदे मातरम या दोन गीतांना राष्ट्रगीताचा दर्जा देण्यात आला.

  •  त्यानंतर डॉ. राजेंद्र प्रसाद यांना भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवडले.

  •  घटनेच्या तीन प्रती बनविल्या गेल्या. त्यावर २८४ सदस्यांनी सह्या केल्या.

  •  यात सर्वप्रथम जवाहरलाल नेहरूंनी व सर्वात शेवटी डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी सही केली.

  •  २६ जानेवारी १९४९ पासून संमत केलेली घटना अंमलात आली.

  • घटना बनविण्याचे कार्य २ वर्ष ११ महिने १७ दिवस चालले, तर मसुदा समिती १४१ दिवस तर घटना समिती १६५ दिवस बसली.

  • सुमारे ५३००० लोकांनी सभेचे काम संविधान हॉलच्या प्रेक्षक हॉलच्या गॅलरीतून पाहिले.

  •  २२ नोव्हेंबर १९४९ पर्यंत ६३,९६,७२९  रुपये खर्च झाले.

  •  या दिवशी देशाचे राष्ट्रपती राज्यांच्या झाकी, जल,स्थल व वायुसेना यांची मानवंदना स्वीकारून शौर्य पदकांचे वितरण करतात.

  • तसेच अतुलनीय शौर्य गाजविणाऱ्या मुलांचा सत्कार करून त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढतात.

  •  सर्व शासकीय कार्यालये, शाळा, कॉलेजेसमध्ये ध्वजारोहण करून राष्ट्रगीतांचे गायन करतात.

  •  या दिवशी स्वातंत्र्यवीरांच्या जीवनावर व्याख्यानांचे आयोजन केले जाते.

  • या दिवशी आपण सर्वांनी मिळालेल्या स्वराज्याचे सुराज्य निर्माण करण्याचा संकल्प सोडवू या….. 

टिप्पण्या