गुरुपौर्णिमा.....

 

  • गुरुपौर्णिमा :

  •  लघु अवस्थेतून गुरु अवस्थेकडे नेतो तो ‘गुरु’ आणि लघू व गुरू या दोनही अवस्थेतून विश्वव्यापी प्रभूचा साक्षात्कार घडवितो ‘सदगुरू’ होय. 

  • ज्याला आपले जीवन समृद्ध व्हावे असे वाटते, त्यांनी सदगुरूंना शरण जावे.

  • परमेश्वरालासुद्धा  सदगुरूंची  गरज वाटली म्हणून तर भगवान श्रीरामांनी वशिष्ट यांची व  प्रभू श्रीकृष्णाने संदीपनींची सेवा केली, म्हणून गुरु गीता सांगते----- गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु  गुरुर्देवो महेश्वरा: || गुरुर साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः  || त्या सदगुरू माऊलींची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा  वा ‘व्यासपौर्णिमा’ होय.

  •  ‘व्यासोच्छीष्टम जगत्सर्वम्’  व्यासांनी वेदांचे व्यवस्थापन  केले. प्रत्येक विषयावर ग्रंथ लिहिले. 

  • श्रीव्यासांनी महाभारत सांगितले व ते श्रीगणरायाने लिहिले. त्यात भीष्म पर्वात असलेली ‘गीता’ विश्वप्रसिद्ध आहे.

  •  वशिष्ठ ऋषींचा मुलगा ‘शतकीर्ती’ यांना आईच्या गर्भात वेदमंत्राचे पठण करणारा ‘पराशर’ हा मुलगा झाला.

  •  एकदा यमुना नदी पार करताना होडी व लढविणार्‍या ‘सत्यवती’ नावाच्या धीवर कन्येची व पराशर ऋषींची एक झाली. 

  • पराशरांपासून सत्यवतीला ‘श्रीव्यास’हा विश्वप्रसिद्ध मुलगा आषाढ शुद्ध पौर्णिमेला झाला म्हणून गुरुपौर्णिमा चे आयोजन केले जाते.   

  • ‘ज्ञानाची व्यवस्था करतो तो व्यास’ व तो ज्या उच्च आसनावर बसून लोकांना ज्ञान सांगतो,  त्या स्थानाला ‘व्यासपीठ’ म्हणतात.

  •  व्यासांना जगद्गुरु व आचार्य अशा पदव्यांनी विभूषित केले आहे. प्रत्येक विषयाचे ज्ञान अधिकृत ग्रंथातून आत्मसात करून, त्याचा विचार करून अनुभव घेतल्यावर जनकल्याणासाठी ते ज्ञान लोकांना सांगतो, त्याला आचार्य म्हणतात.

  •  जन्म देणारी,  सांभाळणारी ,ज्ञान देणारी, संकटात प्राणरक्षण करणारी व मोक्षाला नेणारी अशा पाच माता आहेत, त्यातील सदगुरू ज्ञान देऊन मोक्षाला नेतात, म्हणून त्यांना ‘माऊली’ म्हणतात.

  •  अनुग्रह देऊन आत्मज्ञान देणाऱ्या सदगुरूना सदगुरू दीक्षा, मोक्ष व अनुग्रह गुरु म्हणतात.

टिप्पण्या