राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त....

लोकराजा राजर्षी शाहू महाराजांची २६ जून रोजी जयंती...


  • शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती नाही, असे इतिहास सांगतो.

  • अज्ञानात बुडून गेलेल्या देशात उत्तम मुत्सद्दी व लढवय्ये वीर कधीही निपजणार नाहीत. म्हणूनच सक्तीच्या व मोफत शिक्षणाची भारताला अत्यंत गरज आहे, हीच गरज ओळखून मोफत व सक्तीच्या शिक्षणाची सुरुवात करणारे राजे राजर्षी शाहू महाराज यांची २६ जून रोजी जयंती त्यानिमित्त राजर्षी शाहू महाराजांना विनम्र अभिवादन...

  •  राजर्षी शाहू महाराजांचा २६ जून हा जन्मदिवस 'सामाजिक न्याय दिवस' म्हणून पाळला जातो. 

  • या दिवशी कोल्हापूर या ठिकाणी अनेक सार्वजनिक कार्यक्रम होतात.

  • कोल्हापूर संस्थानचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या  मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी १७ मार्च १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले तेव्हा ते दहा वर्षांचे होते.त्यांनी त्यांचे नाव 'शाहू' ठेवले.

  • १८९४ तिथे राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांनी लगेचच बहुजनांच्या उद्धाराचे कार्य हाती घेतले.

  •  दुष्काळपिडीत शेतकऱ्यांना कर्ज दिले.

  •  बहुजन समाजातून तलाठ्यांच्या नेमणुका करण्याचा अध्यादेश काढला.

  • ते प्रजाहितदक्ष संस्थानिक होते.

  • राजर्षी शाहूंनी सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या समाजात जागृती निर्माण केली.

  • दिखाऊ कार्यापेक्षा चिरस्थायी व कल्याणकारी कार्याला त्यांनी महत्व दिले. 

  • त्यांच्या प्रयत्नांनी व उपक्रमांनी सामाजिक परिवर्तन झाले.

  • एकदा ते युरोप दौऱ्यावर गेले असता, त्यांनी काही धरणे बघितली, त्यातूनच त्यांना राधानगरी धरणाची कल्पना सुचली.

  • म्हणूनच १९११ साली त्यांनी कोल्हापुरात राधानगरी तालुक्यात 'भोगवती नदीवर’ ‘राधानगरी धरण' बांधले.

  •  शाहू महाराजांना कुस्ती हा खेळ आवडत असे.

  •  त्यामुळे मल्लविद्येला प्रोत्साहन देऊन, त्यांनी अनेक मल्लांना राजाश्रय दिला.

  • १८९५ मध्ये मोतीबाग तालीम सुरू केली.

  •  शिक्षणाचा प्रसार व्हावा, म्हणून त्यांनी अनेक सोयी व सवलती उपलब्ध करून दिल्या.

  •  शाळा, महाविद्यालय, वसतिगृहे व शिष्यवृत्त्या सुरू केल्या.

  •  त्यांनी आपल्या महाविद्यालयात उत्तम शिक्षक वर्ग प्रयत्नपूर्वक आणला.

  • शिक्षकांसाठी प्रशिक्षण देण्याची योजना व गुणवत्तेनुसार पदोन्नती देण्याची योजना सुरु केली.

  • 'गाव तिथे शाळा असावी', असा अध्यादेश काढला.

  • बहुजन समाजाला राजकीय हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी डेक्कन रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली.

  • १९०१ साली मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी मराठा बोर्डिंगची स्थापना कोल्हापुरात केली.

  • याच वर्षी नाशिक येथे उदोजी विद्यार्थी वसतीगृहाची स्थापना केली.

  • १९१७ मध्ये विधवांच्या पुनर्विवाहास कायद्याने मान्यता दिली.

  • १९१९ मध्ये स्त्रियांवर होणार्‍या अन्यायाविरुद्ध कठोर कायदा केला.

  •  देवदासी प्रथा कायद्याने बंद केली.

  • कोल्हापूरमध्ये सहकार चळवळीचा व शेतकरी संघटनेचा उपक्रम सुरु होण्यामागे शाहू महाराजांची प्रेरणा होती.

  • लोकजीवनाला क्रीडा, नाट्य व संगीत इत्यादी कलांची जोड त्यांच्याच काळात मिळाली.

  •  अशा या मोठ्या दिलाच्या राजाला कानपूरच्या कूर्मी क्षत्रिय समाजाने "राजर्षी" ही पदवी दिली.

  • या लोकराजाचे ६ मे १९२२ रोजी मुंबई येथे निधन झाले.



टिप्पण्या