इयत्ता ११ वी - (इतिहास) - प्रकरण ३

विषय - इतिहास         

प्रकरण-३ रे   

 भारतातील ताम्रपाषाणयुगीन गाव - वसाहती 



  • भारतात  ज्या कालखंडातील  हत्यारे व  उपकरणांसाठी पाषाणाबरोबरच प्रथम तांब्याचा

उपयोग होऊ लागला, या कालखंडाला ‘ताम्रपाषाणयुग’ असे म्हटले जाते.

  • या कालखंडात तांबे वितळवण्याचे तंत्र भारतातील मानवाने  चांगलेच आत्मसात केलेले होते.

  • या कालखंडात तांब्याच्या कुऱ्हाडी, छिन्न्या आणि अनेक प्रकारचे छोटी शस्त्र तयार झालेले आहेत. 

  • याशिवाय तांब्याचे अनेक उपकरणे आणि अलंकारही उत्खननात सापडले आहेत. 

  • या कालखंडात तांब्याची व मातीची भांडी आढळतात. 

  • ताम्रपाषाणयुगीन संस्कृती म्हणजे तांबे आणि दगड या दोहोंची हत्यारे वापरणार्‍या लोकांची संस्कृती होय.

  •  नैसर्गिक आपत्तीमुळे हडप्पा संस्कृती काळातील लोकांना स्थलांतर करावे लागले. ते लोक जेथे नव्याने वसले, तेथे गाव-वसाहती या स्वरुपात नवीन संस्कृती उदयाला आल्या.

  • या नवीन संस्कृतीचा प्रसार भारतात राजस्थान, गुजरात,बिहार,बंगाल,ओरिसा, मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि गंगेचे खोरे या प्रदेशात झाला.या संस्कृतीना ताम्रपाषाणयुगीन संस्कृती  म्हणतात. 

  • उत्तर हडप्पा संस्कृती काळातील स्थलांतरित लोक जेथे जेथे पोहोचले तेथे स्थानिक संस्कृतीमध्ये ते मिसळून गेले. 

  • या ठिकाणी भांडी घडवणे, तांब्याच्या वस्तू बनवणे, शेती करणे या गोष्टींचे स्थानिक लोकांना ज्ञान दिले. 

  • त्यातून  प्रादेशिकतेनुसार वैशिष्ट्यांचे वैविध्य दर्शविणाऱ्या वसाहतींच्या स्वरूपातील नवीन संस्कृती उदयाला आल्या.

  •  ग्राम-वसाहतीच्या रचनेत नागरी हडप्पा काळातील शिस्त दिसत  नाही. 

  • हडप्पा येथील ‘एच’ या दफनस्थळातील मिळालेल्या अस्थीकुंभावरील नक्षीचे नमुने हे वेगळ्या प्रकारचे आहेत.

  • त्यामध्ये चंद्र,सूर्य,मासे, हरीण आणि मोर या प्रतीकांचा वापर केलेला दिसतो.

  •   अस्थीकुंभावरील मोराच्या पोटात मृताचे शरीर दाखवलेले आहे.

  • उत्तर हडप्पा संस्कृतीचे लोक आर्य होते,असे काही पुरातत्वज्ञाचे मत आहे,पण हे लोक निश्चित कोण होते, हे ठरविण्यासाठी अधिक संशोधनाची गरज आहे.

  • राजस्थान --

  •  ‘आहाड’ किंवा ‘बनास’ संस्कृती--(टीप लिहा.)

  • राजस्थानमधील मेवाड प्रदेशातील ही संस्कृती हडप्पा संस्कृतीची समकालीन संस्कृती आहे.

  •  तिचा कालखंड इ.स.पू. ४०००  इतका प्राचीन आहे.

  •   उदयपूर जवळच्या आहाड येथे सर्वप्रथम तिचा शोध लागला, म्हणून तिला आहाड  संस्कृती असे म्हणतात. 

  • आहाड  संस्कृतीला ‘बनास संस्कृती’ असेही म्हणतात; कारण ही संस्कृती बनास नदीच्या उपनदीवर वसलेली आहे.

  •  बालाथल आणि गिलुंड ही या  संस्कृतीची महत्त्वाची स्थळे आहेत. 

  •  बालाथल येथे मोठ्या प्रमाणावर मातीच्या भांड्यांचे  उत्पादन होत होते.

  • त्याचा पुरवठा आहाड संस्कृतीच्या इतर गाव- वसाहतींना केला जात होता.

  • आहाड संस्कृतीच्या मातीच्या भांड्यांमध्ये काळी आणि तांबडी भांडी महत्वाची आहेत.ती चाकावर घडवलेली असत.त्यांचा आतील भाग आणि तोंडाजवळचा भाग  काळा आणि उरलेला भाग तांबडा असे. 

  •  मातीच्या भांड्याबरोबरच मातीचे बैल, शंखांच्या वस्तू, दगडी पाती, छिन्न्या, बाणाची अग्रे, तांब्याची हत्यारे यासारख्या वस्तू  मोठ्या प्रमाणात मिळाल्या.

  •  बालाथल  येथील घरे पक्क्या विटांची (इंग्लिश बॉण्ड पद्धत) बांधली होती.

  • बालाथलभोवती तटबंदी होती. हडप्पा संस्कृतीशी  असलेल्या संबंधाचा पुरावा आहे.

  • हडप्पा संस्कृतीचे लोक आहाड संस्कृतीच्या लोकांकडूनच तांबे आणि तांब्याच्या वस्तू आयात करत असावेत,असे दिसते.

  • तांबे वितळवून ते शुद्ध करण्याचे ज्ञान त्यांच्याकडे होते.

  • राजस्थानातील खेत्री येथील तांब्याच्या खाणींमधून हे लोक तांबे मिळवत होते.

  • गणेश्वर-जोधपुरा संस्कृती-

  • गणेश्वर-जोधपुरा  संस्कृतीच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या संस्कृतीची अनेक  स्थळे राजस्थानातील  खेत्री परिसरात सापडले आहेत. 

  • या गाव-वसाहती  हडप्पापूर्व काळातील  होत्या. 

  • गणेश्वर येथील उत्खननामध्ये तांब्याचे  बाण आणि भाले यांचे अग्रे,  मासेमारीचे गळ,बांगड्या, छिन्न्या यासारख्या वस्तू आणि आणि मातीची भांडी मिळाले.

  • गणेश्वर-जोधपुरा संस्कृतीचे लोक हडप्पा संस्कृतीच्या लोकांना तांब्याच्या वस्तू पुरवत असत.

  • गंगेचे खोरे- 

  • गेरू रंगाची भांडी आणि ताम्रनिधी-

  •   गेरू रंगाच्या भांड्यांची खापरे नदीच्या पात्रात सापडतात. सहसा पाण्याच्या प्रवाहामुळे ती झिजलेली आणि ठिसूळ झालेल्या अवस्थेत सापडतात.

  •  या संस्कृतीची स्थळे पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशचा पश्चिमेकडील भाग एवढ्या विस्तीर्ण प्रदेशात सापडतात.

  •   राजस्थान-

  • गेरू रंगाची भांडी वापरणाऱ्या लोकांच्या संस्कृतीचा राजस्थानातील काळ इ.स.पू. 3000  वर्षे इतका प्राचीन आहे.

  •  गंगा-यमुना या नद्यांच्या दुआबात इ.स.पू. 2000 च्या सुमारास नांदत होती. 

  •  या काळातील लोक स्थिर  गाव-वसाहतीमध्ये राहत होते. त्यांची घरे, घरातील जमिनी  चोपून तयार केलेल्या आहेत.

  •  त्या घरांच्या आतमध्ये चूली, मातीच्या पक्क्या  भाजलेल्या पुरुषरुपी बाहुल्या, बैल गाईगुरांची हाडे, तांदूळ ,सातू यासारख्या वस्तू सापडल्या.

  •  यावरून या संस्कृतीचे लोक  स्थिर गाव- वसाहतींमधून राहत होते आणि ते शेती करत होते, हे स्पष्ट होते. 

  •  भारतातील ताम्रनिधी प्रामुख्याने उत्तर प्रदेश, बंगाल, बिहार, ओडिसा आणि मध्य प्रदेश येथे मिळाले आहेत.

  •  ताम्रनिधीमधील वस्तूंचे स्वरूप पाहता त्या घडवणारे कारागीर तांब्याच्या वस्तू घडवण्यात निष्णात होते, हे स्पष्ट आहे.

  •   गेरू रंगाची भांडी वापरणाऱ्या लोकांची संस्कृती आणि ताम्रनिधी हे काही ठिकाणी जवळच्या परिसरात सापडतात. 

  • त्यामुळे ताम्रनिधीतील वस्तू घडवणारे कारागीर गेरू रंगाच्या भांड्याच्या संस्कृतीचे होते, असे मानले जाते.

  • ही संस्कृती उत्तर हडप्पा संस्कृती काळातील स्थलांतरित लोकांची आहे, असे काही पुरातत्वज्ञांचे मत होते.

  • तर काही पुरातत्त्वज्ञ गंगा-यमुना नद्यांच्या दुआबात सापडलेल्या ताम्रनिधींचा संबंध वैदिक आर्यांशी  जोडतात.

  •  या संस्कृतीचे मूलभूत लक्षण असलेली गेरू रंगाची भांडी आणि ताम्रनिधी यांच्यामध्ये असलेल्या सान्निध्यामुळे ती एक स्वतंत्र संस्कृती असावी, असाही एक मतप्रवाह आहे.

  • बंगाल, बिहार, ओडिसा-

  •  प्रश्न- हडप्पा संस्कृतीचे लोक बिहारपर्यंत पोहोचले होते. ( तुमचे मत नोंदवा)

  • बंगाल, बिहार, ओरिसा आणि मध्य प्रदेशामध्ये ताम्रनिधी मिळाले असले तरी गेरू रंगाची भांडी या प्रदेशांमध्ये मिळत नाहीत.

  •  या राज्यांमध्ये ताम्रपाषाणयुगीन संस्कृतींची स्थळे उजेडात आली आहेत.

  •  बिहारमधील चिरांड, सोनपूर येथील उत्खननात काळी आणि तांबडी मातीची भांडी मिळाली.

  •  या भांड्यांचे घाट (बनावट) हडप्पा संस्कृतीतील  भांड्यांच्या  घाटांसारखे आहेत.

           हडप्पा संस्कृतीच्या उतरणीच्या काळात या लोकांनी बंगाल, बिहार,ओडिसा या प्रदेशात स्थलांतर केले.

  •  ताम्रपाषाण संस्कृतीचे मूलभूत लक्षण म्हणजे गेरू रंगाची भांडी आणि ताम्रनिधी होय.

  • शिवाय बंगाल आणि ओडिसातील ताम्रपाषाणयुगीन स्थळांमधील  मातीच्या भांड्यांवर हडप्पा संस्कृतीचा प्रभाव आहे. 

  • त्यामध्ये वाडगे, कुंडे यांची घडणही हडप्पा संस्कृतीशी साम्य दर्शवणारी आहे.

  • यावरून असे अनुमान काढले जाते की, हडप्पा संस्कृतीचे लोक बिहारपर्यंत पोहोचले होते. 

  • मध्य प्रदेश : कायथा संस्कृती -

  • मध्य प्रदेशातील कायथा जि.उज्जैन येथे या संस्कृतीचे अवशेष सर्वप्रथम सापडले, म्हणून तिला कायथा संस्कृती म्हणतात.

  •   कायथा संस्कृती  नागरी हडप्पा संस्कृतीची समकालीन  होती. याचा शोध प्रसिद्ध पुरातत्त्वज्ञ डॉ. वाकणकर यांनी लावला.

  •   कायथा  संस्कृतीच्या लोकांचे जीवन शेती आणि पशुपालनावर अवलंबून होते. 

  • हे लोक प्रामुख्याने हाताने बनवलेली मातीची भांडी, गारगोटीच्या दगडांपासून बनवलेली सुक्ष्मास्त्रे वापरत होते.

  •   याशिवाय कायथा येथील घरांमध्ये तांब्याच्या कुऱ्हाडी आणि बांगड्या, मौल्यवान खड्यांचे मणी असलेले हार सापडले.

  •  याशिवाय संगजिरा (steatite) या दगडाच्या भुकटीपासून बनवलेले चकतीच्या आकाराचे छोटे  मणी सापडले.

  •  यावरून कायथा आणि हडप्पा संस्कृती यांच्यातील परस्परसंबंध हडप्पा नगरांच्या उदयाच्याही आधीच्या काळापासून असावा,असे दिसते.

  •  कायथा संस्कृतीनंतर राजस्थानातील आहाड संस्कृतीचे लोक मध्यप्रदेशात आले. काही काळ या दोन्ही संस्कृती मध्यप्रदेशात एकत्र  नांदल्या असण्याचीही शक्यता आहे.

  •  त्यानंतरच्या काळात माळवा संस्कृतीचे अवशेष मिळतात.


  • माळवा संस्कृती- (टिप लिहा)

  • माळवा संस्कृतीचा उगम आणि विस्तार प्रथम माळव्यात झाला.

  •  या संस्कृतीचा कालखंड इ.स.पूर्व १८०० ते १२००  इतका आहे.

  •  नर्मदा नदीतीरावरील नावडाटोली हे या संस्कृतीचे महत्त्व जास्त आहे. 

  •   याशिवाय मध्यप्रदेशातील  सागर जिल्ह्यातील एरण, उज्जैन जिल्ह्यातील नागदा ही  सुद्धा महत्वाची स्थळे आहेत.

  •  नागदा आणि  एरण येथील माळवा संस्कृतीच्या  गाव-वसाहती तटबंदीयुक्त होत्या.

  •  या लोकांची घरे आयताकृती आणि  ऐसपैस असत.


  • गुजरात -

  • प्रश्न- गुजरातमधील ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचे माहिती दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे लिहा.  मुद्दे-१.  कालखंड   २.  व्यवसाय   ३.  विस्तार       ४. इतर संस्कृतींची  आलेल्या संबंधाचा पुरावा.

गुजरातमधील ताम्रपाषाणयुगीन गाव-वसाहतींचा काळ हडप्पा संस्कृतीचे समकालीन आहे. त्यामध्ये -

  •     कालखंड--

१.  पूर्व हडप्पा इसवी सन पूर्व ३९५० -२६०० 

२.   नागरी हडप्पा इ.स.पू.२६०० -१९०० 

३.    हडप्पा संस्कृतीच्या नाशानंतर हडप्पोत्तर काळ.

        या हडप्पा संस्कृतीच्या तिनही  काळाशी मिळताजुळता आहे.

  •      व्यवसाय -

  •  गुजरातमधील ताम्रपाषाणयुगीन वसाहतींच्या  मातीच्या भांड्यांमध्ये कच्छ-सौराष्ट्र, उत्तर गुजरात असे प्रादेशिक वैविध्य आढळते.

  • गुजरातमध्ये गारगोटीच्या खड्यांपासून रंगी-बेरंगी मणी  बनवणे, हा हडप्पा  संस्कृतीमधील एक मोठा उद्योग होता.

  •  गाव वसाहतींमधून  मण्यांसाठी कच्चा माल मिळवणे. मातीची  नक्षीदार भांडी बनवणे.

  •  शेतीतून अन्नधान्य पिकवणे.

  • यासारखे व्यवसाय ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीच्या काळात गुजरातमध्ये अस्तित्वात असावे, असे दिसते.

  •  विस्तार -

  • गुजरातमधील या ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचा विस्तार कच्छ-सौराष्ट्र, उत्तर गुजरात अशा विस्तीर्ण प्रदेशात झालेला होता. 

  •  इतर संस्कृतींशी आलेल्या संबंधाचा पुरावा -

  • या संस्कृतीचा संबंध दक्षिण सौराष्ट्रातील ‘प्रभाव संस्कृती’ आणि ईशान्य सौराष्ट्रातील ‘रंगपुर संस्कृती’ यांच्याशी होता.

  • उत्तर हडप्पा काळात दक्षिण सौराष्ट्रात प्रभास जि. जुनागड येथे प्रभास संस्कृती, तर      ईशान्य सौराष्ट्र रंगपूर जि. लिम्बडी येथे रंगपुर संस्कृती उदयाला आली.

  • या दोन ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीमधील मातीच्या भांड्यांचे रंग, नक्षी, घाट याबाबतीत साम्य होते. 

  •  या संस्कृती इसवी सनापूर्वी १८०० - १२०० या काळात अस्तित्वात होत्या. 

  •   ताम्रपाषाणयुगीन महाराष्ट्र -              

  • महाराष्ट्रामध्ये उत्तर हडप्पा संस्कृतीचे लोक पोहोचले होते, याचा पुरावा दायमाबाद येथे मिळाला आहे. 

  • हडप्पा संस्कृतीचे लोक तिथे पोहोचण्याआधीच्या काळात तिथे जी ताम्रपाषाणयुगीन संस्कृती  होती, तिला सावळदा संस्कृती म्हणतात.

  •  त्यानंतरच्या काळात तेथे अनुक्रमे माळवा संस्कृती आणि जोर्वे संस्कृतीचे अवशेष मिळालेले आहेत.

  • सावळदा संस्कृती -

  • धुळे जिल्ह्यात तापी नदीच्या काठी हे स्थळ आहे.

  •  सावळदा संस्कृतीचा काळ इसवी सनापूर्वी सुमारे २००० -१८००  असा होता.

  •  या संस्कृतीचा उगम उत्तर महाराष्ट्रातील मध्याश्मयुगीन लोकांचा सौराष्ट्रातील हडप्पा संस्कृतीच्या  लोकांशी  आलेल्या संपर्कातून झाला असावा.

  • कारण धुळे जिल्ह्यातील कावठे या स्थळाच्या  उत्खननात सापडलेल्या  शंखांच्या वस्तू महाराष्ट्रातील हडप्पा संस्कृतीच्या लोकांची असलेल्या विनिमयाचा पुरावा आहे.

  • दायमाबाद येथील या संस्कृतीचे लोक चाकावर घडवलेली मातीची भांडी वापरत होते.

  • त्या भांड्यांवरील  नक्षीमध्ये  तीराग्रे ,माशांचे गळ, विविध प्राणी यांच्या आकृतींचा समावेश होता. 

  • याशिवाय तांब्याच्या वस्तू, हाडांपासून  बनवलेली तिराग्रे,खड्यांचे  मणी ,दगडी पाटे-वरवंटे इत्यादी वस्तू त्यांच्या वापरात होत्या.

  •  त्यांच्या  गाव-वसाहतींभोवती तटबंदी बांधलेली होती. त्यांची घरे मातीची असून, घरातील  जमिनी गाळ आणि माती एकत्र  चोपून  बनवलेल्या होत्या.

  •  माळवा आणि जोर्वे संस्कृती :  महाराष्ट्राचे आद्य शेतकरी -

प्रश्न- माळवा संस्कृतीच्या लोकांना ‘महाराष्ट्राचे आद्य शेतकरी’ म्हटले जाते. (सकारण स्पष्ट करा.)

  • महाराष्ट्रातील आद्य शेतकऱ्यांच्या गाव-वसाहती ताम्रपाषाणयुगीन होत्या.

  • इसवी सनापूर्वी १६०० च्या  माळवा संस्कृतीचे लोक महाराष्ट्रात पोहोचले.

  • माळवा संस्कृतीच्या लोकांनी महाराष्ट्रामध्ये प्रथम शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी गाव वसाहती वसविल्या.

  •  हे शेतकरी शेतीत गहू, बार्ली, ज्वारी अशी पिके घेऊ लागले. 

  • त्यामुळे माळवा संस्कृतीच्या लोकांना महाराष्ट्राचे आद्य शेतकरी म्हटले जाते.

          महाराष्ट्रात आल्यावर त्यांचा संपर्क कर्नाटकातील नवाश्मयुगीन संस्कृतीच्या लोकांशी

          आला    .  

  • त्यामुळे सावळदा संस्कृतीचे लोक घडवत असलेल्या मातीच्या भांड्यांचे तंत्रज्ञान, घाट नक्षीचे नमुने यामध्ये काही बदल घडून आले आणि जोर्वे संस्कृती या नावाने ओळखली जाणारी नवीन संस्कृती उदयास आली.

  • अहमदनगर जिल्ह्यातील जोर्वे येथे हे संस्कृती प्रथम उजेडात आली. म्हणून तिला जोर्वे संस्कृती असे म्हणतात.

  • महाराष्ट्रात ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचा विस्तार तापी, गोदावरी आणि  भीमा या नद्यांच्या खोऱ्यात झाला होता.

  • इनामगाव,ता.शिरूर, जि. पुणे. येथील विस्तृत उत्खननामुळे माळवा आणि जोर्वे संस्कृतीमधील लोकांच्या जीवनाबद्दल सविस्तर माहिती उपलब्ध झालेली आहे.  

१. माळवा संस्कृती--- इ.स.पू.१६०० -१४०० 

२.  पूर्व जोर्वे संस्कृती-- इ.स.पू.१४०० -१००० 

३.  उत्तर जोर्वे संस्कृती-- इ.स.पू.१००० -७०० 

  उत्खनित  स्थळे-

   दायमाबाद,प्रकाशे, जिल्हा नंदुरबार, चांडोली, सोनगाव, इनामगाव, वाळकी  जिल्हा पुणे,  नेवासे जिल्हा अहमदनगर, पिंपळदर जिल्हा नासिक,

  • माळवा संस्कृती ( इ.स.पू.१६००-१४०० ) 

    या काळातील लोकांची घरे--

  • लोकांची घरे आयताकृती आणि ऐसपैस  होती. घराच्या भिंती कुडाच्या असत. 

  • घरामध्ये आडभिंत घालून घराचे दोन भाग केलेले असत. 

  • जमिनीतून गोल  खड्डा करून झोपड्या( गर्तावास )  उभारल्या जात.

  धान्य साठवण व्यवस्था--

  • कोठी ठेवण्यासाठी एक गोल ओटा,चार पायांचे रांजण ठेवण्यासाठी टेकूचे चार चपटे दगड आणि चून्याने लिंपलेले बळद  यासारख्या गोष्टीवरून घरामध्ये दीर्घकालीन साठवणूक करण्यासाठी केलेली तरतूद लक्षात येते.

मातीची भांडी-  

  • मातीची भांडी पिवळसर  रंगाची असत. त्यावर तपकिरी रंगात नक्षी काढलेली असे.  त्यांचा पोत खरबरीत असतो. 


  • पूर्व जोर्वे संस्कृती ( इ.स.पू.१४००-१०००)

  •  या काळातील लोकांची घरे-

  • घरे चौकोणी, प्रशस्त, एकापेक्षा अधिक खोल्यांचे होते. गोल खड्डा करून त्यावर  उघडलेल्या झोपड्यांची (गर्तावास) संख्या नगण्य होती.

  •  गाव प्रमुखाचे मध्यवर्ती जागेत पाच खोल्यांचे घर होते.

  • मातीची भांडी--

  •  त्या काळातील भांडी खणखणीत भाजलेली असल्यामुळे  त्यांचा नाद धातूच्या  भांड्याप्रमाणे असतो. 

  • त्यांचा रंग लाल असतो आणि काळ्या  रंगाने नक्षी काढलेली असते. 

  • मध्यभागी कंगोरे असलेले वाडगे आणि कुंडे, चंबु, घडे अशा घाटाच्या  भांडयांचा समावेश होता.

  •  या काळातील कुंभकाराच्या भट्ट्या गोल आकाराच्या होत्या. त्यांची क्षमता  जास्त होते.

  • इनामगाव हे इतर गावांना मातीची भांडी पुरवणारे केंद्र होते.

पूर्व जोर्वे काळात इनामगावमध्ये नदीला कालवा काढून नदीचे पाणी साठवण्याची सोय केली होती. 

  •  सिंचनासाठी वापर होत असे. गाव प्रमुखाकडे पाणीवाटपाचे अधिकार होते. गाव प्रमुख पद वंशपरंपरागत होते. हे दर्शवणारी  दफणे प्रमुखाच्या घरालगत सर्वसाधारण  दफना पेक्षा  वेगळ्या पद्धतीची होती.

  •   धान्य साठवण व्यवस्था-घराच्या बाहेर बरीच बळदे होती.येथील शेतकरी गहू,बार्ली, ज्वारी, मसूर, कुळीथ यासारखी पिके घेत होते.

  •  दफनपद्धती- प्रमुखाची दफने  घरालगतच वेगळ्या पद्धतीची होती. 

  • साधारणत: जमिनीत खड्डा खणून मृत व्यक्तीला उताण्या अवस्थेत पुरले जाई. तर कधी मृत व्यक्तीला एका चार पायाच्या, फुगिर पोटाच्या  रांजणात बसलेल्या अवस्थेत पुरले जाई.

  •  दोन पद्धतीने दफन केले  जाई. मृत बालकाला पुरण्यासाठी कुंभाचा वापर  करत असत.

  • उत्तर जोर्वे  संस्कृती ( इ.स.पू.१००० -७०० )- 

  • या काळातील लोकांची घरे- या काळात हवा शुष्क होऊ लागली, त्यामुळे लोकांना फिरस्ते जीवन जगावे लागले. 

  • परिणामी घराऐवजी झोपड्यांची संख्या वाढली. त्या गर्तावासाहून  वेगळ्या होत्या.टोकाला बांधलेला जुडगा तळाकडे पसरून तंबूप्रमाणे शंक्वाकृती झोपड्या होत्या.

  •  मातीची भांडी- पूर्व जोर्वे संस्कृती काळासारखे भांड्यांचे घाट असले तरी त्यावर फारसे  नक्षीकाम नव्हते.

  •  कुंभाराचे आवे( भट्ट्या) जमिनीवरच  रचले जात.

  • भारतातील महापाषाण युग -

  •  प्रतिकूल हवामानामुळे उत्तर जोर्वे काळात म्हणजे इ.स.पु. ७०० च्या काळात इनामगाव पूर्णपणे उजाड झाले.

  •  तेथील लोक भटके जीवन जगू लागले. त्या आकाराने मोठ्या असलेल्या  शिळांचा उपयोग करून उभारलेली शिलावर्तुळे सापडतात. 

  • त्या वर्तुळात दफने  असत.

  •    या शिळा आकाराने मोठ्या असल्याने त्यांना महापाषण तर ही शिळावर्तुळे ज्या काळातील आहेत, त्यांना महापाषाणयंग म्हणतात.

  •  ही शिलावर्तुळे अस्थी पुरण्यासाठी स्मारक म्हणून वापरली जात. 

  • जगभर शीलावर्तुळे सापडतात, त्यांची परंपरा प्रागैतिहासिक काळापासून आजपर्यंत आहे.

  • प्राचीन  शिलावर्तुळे इसवीसन पूर्व १५००  ते इ.स.पू.५०० या काळातील आहे.

  •  महाराष्ट्रातील शिलावर्तुळे इसवीसन पूर्व १००० ते  इसवी सन पूर्व ४०० या काळातील आहेत.

  •  ती उभारणारे लोक दक्षिण भारतातून आले असावेत.  ती लोह युगातील आहे.

  •  महाराष्ट्रात विदर्भामध्ये नागपूर, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यात टाकळघाट,माहूरझरी,  खापा, नायकुड  अशा अनेक ठिकाणी उत्खनन केले.  

  • अनेक शिलावर्तुळे प्राचीन व्यापारी मार्गावर होती.

  •  या काळातील कारागिरांच्या स्थिर गाव-वसाहतीचे अवशेष क्वचित सापडतात.  

  • शीलावर्तुळाच्या दफनात घोड्याची हाडे व दागिने मिळाले.

  •  यावरून या काळात लोक वाहन आणि सामान लादण्यासाठी घोड्यांचा वापर करत असावेत. 


- समाप्त -


टिप्पण्या