नामदार गोपाळ कृष्ण गोखले....

 

  • नामदार गोपाळ कृष्ण गोखले -

  • अखिल भारतीय काँग्रेसचे ना.गो.कृ.गोखले चिटणीस असताना काँग्रेसच्या चळवळीत मुसलमानांची संख्या कमी जाणवत होती.

  • नामदार गोखल्यांजवळ धार्मिक कडवेपणा व पूर्वग्रह यांचा लवलेशही नव्हता. म्हणून ते मुसलमान पुढार्‍यांच्याजवळ मोकळेपणाने बोलत असत.

  • त्यांच्या सर्वधर्मसमभाव या विचारसरणीमुळे मुसलमान आकर्षित झाले.

  • त्यांच्या सभांना मुसलमान सुशिक्षित तरुण मोठ्या संख्येने हजर असत.

  • अलिगढ येथे ना. गोखले भाषणासाठी गेले असता, त्यावेळी मुसलमान तरुणांनी अलिगढ स्टेशनवरच त्यांचे स्वागत केले.

  • त्यांना आणण्यासाठी जी घोडागाडी आली होती, त्या गाडीचे घोडे मुसलमान तरुणांनी काढले. गाडीत गोखल्यांना बसवले व स्वतः त्यांची गाडी ओढत-ओढत सभास्थानी आणली.

  • तरुणांनी 'गोखले जिंदाबाद' अशा घोषणा दिल्या. 

  • गोखल्यांचे ह्रदय अशा सन्मानामुळे उचंबळून आले. ते म्हणाले तरुण मुसलमानांचा माझ्या व हिंदुस्थानविषयीचा जिव्हाळा विलक्षण आहे. त्यांचा उत्साह उचंबळून येत आहे, असे मला जाणवले.

  • हिंदुस्थानला आता थोड्याच दिवसात स्वराज्याचे अधिकार प्राप्त होतील, याबाबत माझ्या मनात शंका उरली नाही, असे मत त्यांनी भाषणात मांडले.

  • देशाच्या विकासाच्या दृष्टीने विचार केला. तो हिंदुस्थानात सर्व जाती-जमाती व धर्मांध घेऊन हिंदुस्थान हा एकसंघ झाला पाहिजे, हीच त्यांची मनोकामना होती.

  • त्यांच्या या विचारसरणीला आगाखान यांचा पाठिंबा होता.

  • त्यांनी गोखलेंना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, प्रत्येक विचारी व साध्या हिंदी मुसलमानाने ज्या प्रकारची ध्येयधोरणे डोळ्यासमोर ठेवून काम करावे, तशाच स्वरूपाची ध्येय व धोरणे तुम्ही बाळगली आहेत आणि तोच तुमचा स्वधर्म आहे.

  • लखनौ मुक्कामी संयुक्त प्रांताचे सर्वात मोठे जमीनदार व महमूदाबादचे राजेसाहेब यांनी गोखले यांचा सत्कार केला.

  • मोठी मेजवानी त्यांच्या सन्मानार्थ दिली.

  • लखनौच्या गोखल्यांच्या सार्वजनिक सभेचे तेच अध्यक्ष होते.

  • लाहोर येथे मुस्लिम लिली या संस्थेने 'हिंदू-मुस्लिम समस्या' या विषयावर भाषण करण्यासाठी गोखले यांना निमंत्रित केले.

  • मुसलमान समाजाने केलेला गौरव हा त्यांच्या सन्मानातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सन्मान होता.

  • आपल्या भाषणात ते म्हणाले की, हिंदू-मुस्लिम ही समस्या देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने इतर प्रश्नांपेक्षा अधिक महत्त्वाची आहे.

  •  ही समस्या समाधानकारकपणे सोडवायची असेल, तर समयसूचकता, धीर व सारासार विवेक या गुणांची गरज आहे.

  • निर्विकार, निरपेक्षवादी व पूर्वग्रह विरहित मनाने या प्रश्नांची आज मी चिकित्सा करणार आहे आणि या वृत्तीने तुम्ही माझे भाषण ऐकाल, अशी माझी आशा आहे.

  •  हिंदू व मुसलमान या दोन्ही जमातींचे संबंध सलोख्याचे नाहीत, हे मला मान्य आहेत.

  •  पण या दोन जमातीतील तणावाचा फायदा ब्रिटिशांनी घेतला व आपले राज्य स्थापन केले.

  • आज या दोन्ही जमाती देशात शांततेने नांदत आहेत.

  •  पण दक्षिण आफ्रिकेत हिंदू व मुसलमान या दोघांवरही ब्रिटिश अत्याचार करीत आहेत.

  •  हिंदुस्थानात या दोन्ही जमाती एकोप्याने व सलोख्याने नांदल्या पाहिजेत, ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे.

  • बहुसंख्य हिंदूनी अल्पसंख्य मुसलमानांच्या मनातील भीती दूर केली पाहिजे, हे हिंदूंचे कर्तव्य आहे.

  •  हिंदू-मुसलमानांनी या देशाची सेवा करण्याचे व्रत अंगिकारले पाहिजे.

  •  हिंदुस्थान ही आम्हा दोन्ही जमातींची मातृभूमी आहे, ही गोष्ट मुसलमानांनी स्वीकारली पाहिजे.

  •  म्हणजेच 'फोडा झोडा' या ब्रिटिश नीतीला पायबंद बसेल.

  •  भारत सेवक समाजसंस्थेची स्थापना गोखले यांनी केली. त्यावेळी आगाखान यांनी या संस्थेला देणगी दिली.

  •  या संस्थेचे सदस्यत्व मिळावे, म्हणून बॅरिस्टरची नागो कल्याणकडे गेले.

  •  पण गोखले यांनी त्यांना प्रथम या संस्थेची घटना व नियमावली वाचण्याचा सल्ला दिला हे सर्व वाचून बॅरिस्टरची ना त्यांच्याकडे गेले व त्यांनी आपली असमर्थता प्रकट केली पण आपणाला प्रति गोखले व्हायचे आहे अशा आशीर्वादाची गोखल्यांकडे मागणी केली.

  •  हिंदू-मुस्लिम ऐक्याचा प्रश्न आजही सुटलेला नाही.

  •  पण वरील विवेचनावरून गोखले यांनी मात्र या समस्यांवर तोडगा दिला.

  • आपल्या कार्यकालात हिंदू-मुस्लीम ऐक्य साध्य केले असा निष्कर्ष काढणे योग्य ठरेल.

टिप्पण्या