स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन ...

 


  • स्वातंत्र्यवीर सावरकर---

  • एक साहित्यिक व  विचारवंत, समाजसुधारक आणि भाषाशुद्धी व लिपिशुद्धीचे पुरस्कर्ते विनायक दामोदर सावरकर उर्फ स्वातंत्र्यवीर सावरकर यांची २८ मे रोजी जयंती….

ने मजसी ने परत मातृ भूमीला|, जयोस्तुते, श्रीमहन्मंगले|  शिवास्पदे शुभदे| किंवा 

तुजसाठी मरण ते जनन| 

  • अशा अनेक अमरकाव्यांची निर्मिती करणाऱ्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर उर्फ तात्या यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर ह्या गावी झाला.

  • त्यांना गणेश उर्फ बाबाराव, नारायण हे दोन भाऊ व मैना नावाची एक बहीण होती. 

विनायक दामोदर सावरकर हे ९ वर्षांचे असतांना आई राधाबाई यांचा मृत्यू झाला. 

  • १८९९ ला त्यांचे पिता श्री. दामोदरराव यांचा मृत्यू झाल्यानंतर ही सर्व मुले नाशिकला राहण्यास आली. 

  • त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण नाशिक येथे झाले. 

  • १९०५ साली पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून ते बी.ए. झाले. 

  • त्यांचा विवाह भाऊसाहेब चिपळूणकर यांची कन्या यमुना यांच्याशी झाला.

  • सावरकरांनी १८९९ मध्ये 'राष्ट्रभक्तसमूह', १  जानेवारी १९०० रोजी नासिक येथे 'मित्रमेळा' या संस्था स्थापन केल्या.

  • लहानपणापासूनच त्यांच्यावर क्रांतिकारक विचारांचा प्रभाव होता.

  • इ.स.१९०४ ला नासिक येथे मोठा मित्रमेळा भरविला व त्यातून 'अभिनव भारत' या संघटनेची स्थापना केली.

  • बी.ए. झाल्यानंतर ते मुंबईला जाऊन एल.एल.बी. झाले.नंतर बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला गेले. 

  • तेथे श्यामजी कृष्ण वर्मा यांनी स्थापन केलेल्या 'इंडिया हाऊस' मध्ये राहिले.

  • अभ्यास करीत असताना ते १८५७ सालच्या स्वातंत्र्ययुद्धाचा वाढदिवस, शिवजयंती वगैरेंसारखे राष्ट्रीय उत्सव साजरे करण्यात पुढाकार घेत.

  • तिथे त्यांनी अभिनव भारत या संस्थेची स्थापना केली. 

  • अभिनव भारत या संस्थेचे कार्यकर्ते भारतातील स्वातंत्र्यवीरांना शस्त्रे पाठवीत.

  • स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ‘जोसेफ मॅझिनी’ यांचे आत्मचरित्र राजकारण आणि  ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ हे ग्रंथ लिहिले व आपले बंधू श्री बाबाराव सावरकरांजवळ प्रकाशित करण्यास भारतात पाठविले.

  •  हे दोन्ही ग्रंथ सरकारला बाबाराव सावरकरांजवळ सापडल्यामुळे त्यांना अटक करून देशद्रोहाचा आरोप ठेवून काळ्यापाण्याची शिक्षा भोगण्यासाठी अंदमानमध्ये पाठवून दिले.

  • बाबाराव सावरकरांचा कोणताही दोष नसताना सरकारने त्यांना जन्मठेपेची शिक्षा दिली.

  • त्यांना ही शिक्षा होण्यास नाशिकचा कलेक्टर जॅक्सन व इंग्लंडमध्ये लंडनमधील इंडिया हाऊसमधील  कर्झन वायली हे दोघे कारणीभूत असल्यामुळे त्यातील कलेक्टर जॅक्सनचा वध अनंत कान्हेरे यांनी मंगळवार २१ डिसेंबर १९०९  रोजी नाशिकच्या विजयानंद नाट्यगृहात केला.

  • त्यासाठी अनंत कान्हेरे यांना १९ एप्रिल १९१० या दिवशी फाशी देण्यात आले.

  • तर मदनलाल धिंग्रा यांनी १ जुलै १९०९ ला कर्झन वायली याचा नॅशनल असोसिएशनच्या वार्षिक उत्सवात जहांगीर हॉलमध्ये रात्री  ९  वाजता वध केला.

  • मदनलाल धिंग्रा यांनादेखील १६ ऑगस्ट १९१० ला फाशी देण्यात आली.

  • या दोघांच्या खुनामागे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हात असल्याचा शोध सरकारने लावला.

  • अनंत कान्हेरे यांनी ज्या पिस्तुलाने जॅक्सनला मारले, ते पिस्तुल स्वातंत्र्यवीर विनायक सावरकरांनी इंग्लंडमधून पाठविले, अशी सरकारची धारणा होती.

  • आपल्या दोन जिवलगांना हौतात्म्य मिळाल्याने निराश झालेले स्वातंत्र्यवीर सावरकर मादाम कामा यांच्या आमंत्रणामुळे पॅरिसला गेले व काही दिवसांनी भारतात येण्यासाठी निघाले असताना त्यांना लंडनच्या व्हिक्टोरिया रेल्वे स्टेशनवर १३ मार्च १९१० रोजी अटक केली.

  • भारतात घेऊन जाऊ लागले असताना ती बोट दुरुस्तीसाठी फ्रान्समधील ७ जुलै १९१० ला थांबली. त्याचवेळी सावरकर बोटीच्या स्वच्छतागृहाच्या खिडकीतून ८ जुलै १९१० ला समुद्रात उडी मारून पळून जाऊ लागले.

  • ते फ्रान्समधील मार्सेलिस बंदराची भिंत ओलांडणार, इतक्यात त्यांना अटक करण्यात आली.

  • त्यानंतर भारतात आणून त्यांच्यावर खटला भरला. त्यांना पन्नास वर्षांची जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आणि अंदमानात पाठविण्यात आले.

  • "पन्नास वर्ष! तोवर ब्रिटिश राज्य टिकले तर ना!" हे त्यांचे शिक्षा ऐकल्यानंतरचे तेजस्वी उद्गार भारताच्या इतिहासात नोंदले गेले आहेत.

  • त्यांना २४ डिसेंबर १९१० ला पहिली व ३१ जानेवारी १९११ ला दुसरी अशा दोन जन्मठेपेच्या शिक्षा, ५० वर्ष काळ्यापाण्याच्या शिक्षा झाल्या व त्यांना अंदमानमधील सेल्युलर जेलमधील कोठडीत ठेवून, त्यांच्याकडून घाण्याला जुंपून तेल गाळून घेणे, काथ्याची दोर वळणे, असली जुलुमी कामे करून घेण्यात आली.

  • सावरकर बंधूंची अंदमानच्या जेलमध्ये भेट झाली.

  • परंतु त्यांना तेथे एकमेकांशी बोलता येत नसे. म्हणून आवाजातून सांकेतिक भाषा तयार करून ते परस्परांशी बोलत असत.

  • जेलमधील भिंतीवर ते कविता लिहित व पाठ करीत.

  • बंधु बाबाराव यांना इ.स. १९२१ साली अंदमानातून मुक्त करण्यात आले व भारतात आणून १९२२ ला बाबाराव सावरकरांना तर इसवी सन १९२४ ला सावरकरांना मुक्त करण्यात आले.

  • अर्थात ‘रत्नागिरी जिल्ह्याच्या बाहेर जाऊ नये’, असे सावरकरांना बंधन घालण्यात आले.

  • त्यांनी 'माझी जन्मठेप' हा ग्रंथ लिहून तुरुंगवासातील आत्मानुभव कथन केले आहेत.

  • त्यामुळे ते इसवीसन १९२४ ते १९३७ पर्यंत रत्नागिरीत आपल्या पत्नीसोबत राहिले.

  • त्यांना प्रभात ही कन्या व विश्वास हा मुलगा होते.

  • रत्नागिरीत त्यांनी पतितपावन मंदिराची उभारणी केली व शंकराचार्यांच्या हस्ते त्याचे उद्घघाटन केले.

  • अस्पृश्यता निवारण, सहभोजन, रोटीभेदास विरोध या मार्गांनी हिंदू धर्मियांच्या ऐक्यासाठी प्रयत्न केले.

  • 'हिंदू एकता' व 'अखंड भारत' हे त्यांचे ध्येय होते.

  • १९३७ ला मुक्त झाल्यावर ते हिंदुमहासभेचे अध्यक्ष झाले.

  • इ. स.१९४८ ला गांधीहत्येत त्यांचा हात असल्याच्या संशयावरून त्यांना अटक झाली. पण ते निर्दोष असल्याचे सिद्ध झाले.

  • १९६० ला सावरकर बंधूंसाठी ‘मृत्युंजयदिन’ पाळून अंदमानमधील ज्या खोलीत ते राहिले, त्या खोलीला ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून घोषित करून तिथे त्यांचा नामफलक लावण्यात आला.

  • जाज्वल्य राष्ट्रनिष्ठा असलेल्या या थोर क्रांतिकारकास भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी बजावलेल्या महान कामगिरीबद्दल इ.स. १९६५ ला त्यांचा ‘अग्रगण्य स्वातंत्र्यवीर’ म्हणून गौरव करण्यात आला.

  • माझी जन्मठेप, भारतीय स्वातंत्र्यसमर, संन्यस्त खड्ग, हिंदूपदपादशाही,  कमला (काव्यसंग्रह) व काळे पाणी ही त्यांची ग्रंथसंपदा.

  • १९३८  साली मुंबई येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.

  • १९४५ ला बाबाराव,१९५६ ला नारायणराव व १९६५ ला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पत्नी यमुनाबाई देवाघरी गेल्यावर सावरकरांच्या मनावर आघात झाला व त्यांनी २२ दिवस अन्नत्याग करून २६ फेब्रुवारी १९६६ ला आपला प्राण अनंतात विलीन केला.


टिप्पण्या