पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त २७ मे.....

 

  • पंडित जवाहरलाल नेहरू : २७ मे पुण्यतिथीनिमित्त... 

  • भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी नेते, जागतिक शांततेचे पुरस्कर्ते, आधुनिक भारताचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म गंगा, यमुना व सरस्वती यांचा त्रिवेणी संगम असलेल्या प्रयोगक्षेत्र म्हणजे अलाहाबाद येथे झाला.

  • पंडित मोतीलाल नेहरू व स्वरूपाराणी यांच्या या पुत्राचे बालपण अत्यंत वैभवात गेले.

  • प्राथमिक शिक्षण इंग्रजी शिक्षकाकडून घरीच, वडिलांनी बांधलेल्या ऐश्वर्यसंपन्न 'आनंदभवन' नामक बंगल्यात झाले.

  • आज हे घर राष्ट्रीय स्मारक आहे.

  • मोतीलालजींनी आपल्या मुलाला माध्यमिक व उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला ठेवले.

  •  इंग्लंडला हॅरोच्या 'ब्रिटिश पब्लिक स्कूल मध्ये त्यांचे शिक्षण झाले. 

  • १९१२ ला नेहरू बॅरिस्टर झाले. बॅरिस्टर व एम. ए. या पदव्यांसाठीचा अभ्यास करताना जवाहरलाल यांनी नामवंत पाश्चात्य विचारवंतांचे ग्रंथही वाचले. 

  • त्यामुळे त्यांचे मन उदारमतवादी व विशाल झाले.

  • भारतात परतल्यावर त्यांचा विवाह कमला कौल या दिल्लीत राहणाऱ्या  युवतीशी झाला. 

  • ते अलाहाबाद उच्च न्यायालयात वडिलांप्रमाणेच वकिली करू लागले.

  •  इंग्लंडमध्ये ७  वर्ष तर तिथून येताना आयर्लंडमध्ये जाऊन राहिले. 

  • वडिलांबरोबर फ्रान्स, जर्मनी, नॉर्वेचा प्रवासही त्यांनी केला. 

  • पण आपल्या शिक्षणाचा उपयोग केवळ पोट भरण्यासाठी न करता देशबांधवांच्या सेवेसाठी ही करावा, असे त्यांच्या मनात आले.

  • ते आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांमध्ये फिरुन, त्यांच्यावर जमीनदार व सरकार यांच्याकडून होणारे अन्याय  विनामूल्य दूर करू लागले.

  • त्यामुळे लवकरच ते रंजल्या- गांजलेल्यांचे दैवत बनले. 

  • आपला भारत इंग्लंडसारखा स्वतंत्र देश असावा, असे त्यांना वाटत असे. 

  • इ.स.१९१२ ला ते बांकीपूर येथे काँग्रेसच्या अधिवेशनात प्रतिनिधी म्हणून गेले. 

  • तेथे गोपाळ कृष्ण गोखले यांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाची छाप त्यांच्यावर पडली.

  • लोकमान्य टिळकांच्या लढाऊ वृत्तीनेही ते  भारावून गेले.

  • मोतीलाल नेहरू, डॉ. ॲनी बेझंट, सरोजिनी नायडू व महात्मा गांधी यांच्या प्रेरणेने स्वातंत्र्यलढ्यात आले. 

  • त्यांचा १९१६ मध्ये दिल्ली येथे कमलादेवी (कमला कौल काश्मिरी व्यापाऱ्याची मुलगी) या मुलीशी विवाह झाला. 

  • त्यांना हर्ष नावाचा मुलगा झाला, पण तो अल्पायुषी ठरला. 

  • १९  नोव्हेंबर १९१७ ला इंदिरा ही मुलगी झाली. 

  • मोतीलाल व जवाहरलाल या पिता-पुत्रांनी वकिली सोडून देशसेवेत स्वतःला वाहून घेतले.

  • गांधीजींबरोबर सत्याग्रहात भाग घेऊ लागले.

  •  १९०३ ला ते काँग्रेसमध्ये आले. १९१६ लखनौच्या अधिवेशनात ते महात्मा गांधींजींजवळ आले.

  • त्यांच्या जीवनात दोन दुःखद घटना घडल्या. त्यांचे वडील मोतीलालजींचे १६ फेब्रुवारी १९३१ ला निधन झाले.

  • त्यांची पत्नी कमलादेवी आजारी पडल्या. त्यांना घेऊन ते स्विझर्लंडला गेले. तेथे लोझोन या गावी उपचार घेताना कमलादेवींचे २८ फेब्रुवारी १९३६ ला  निधन झाले.

  • भारतभर कायदेभंगाची चळवळ सुरू झालेली होती.

  •  कायदेभंग करणाऱ्यांना इंग्रज सरकारने अटकेत टाकले.

  •  तुरूंगात नेहरूंनी स्वतःचे आत्मचरित्र लिहिण्यास घेतले.

  • त्यांनी 'भारताचा शोध', 'इंदिरेस पत्रे', यासारखी अनेक पुस्तके तुरुंगात व तुरूंगाबाहेर लिहिली.

  • १९५५ साली राष्ट्रपतींनी त्यांना 'भारतरत्न' हा किताब देऊन सन्मानित केले होते.

  • काँग्रेस कार्यात नेहरू जास्त लक्ष देऊ लागले.

  • प्रचारकार्य व जाहीर भाषणे वाढली. त्यामुळे राज्यद्रोहाबद्दल नेहरूंना अटक झाली.

  •  ते भारताच्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत दौरे काढून स्वातंत्र्याबद्दलच्या विचारांचा प्रसार करू लागले.

  • त्यातच त्यांची आई स्वरूपाराणी या ही जग सोडून गेल्या.

  • संपूर्ण नेहरू कुटुंब स्वातंत्र्यसमरात उतरले होते.

  • १९४२ च्या 'चले जाव' चळवळीस सुरुवात झाली होती.

  •  ते युरोपच्या दौऱ्यावर गेले. त्यांचे अनेक ठिकाणी भव्य स्वागत झाले.

  • दुसऱ्या महायुद्धात इंग्रजांना मदत करण्याबद्दल भारतीयांनी नकार दर्शवला.

  • इंग्रजांनी नेहरू-गांधी यांना अटक केली.

  • सुभाषबाबूंच्या आझाद हिंद सेनेवर राजद्रोहाचे खटले भरले गेले. 

  • त्यावेळी नेहरूंनी पुन्हा खटला लढवला. त्यात त्यांना यश मिळाले.

  • १९२१ साली गांधीजींनी सुरू केलेल्या असहकाराच्या चळवळीपासून, १९४२ च्या भारत छोडो चळवळीपर्यंतच्या प्रत्येक चळवळीत भाग घेतल्याने, आयुष्याची १५ वर्ष तरी त्यांनी कारावासात काढली.

  • त्यांनी कामगार संघटनांना तसेच संस्थानातील प्रजाजनांच्या चळवळींना ही मार्गदर्शन केले.

  • १९२९  साली लाहोरला भरलेल्या काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून त्यांनी संपूर्ण स्वातंत्र्याची, तर १९३६ साली लखनौला भरलेल्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदावरून समाजवादावर आधारित समाजरचनेची घोषणा केली.

  • पुढे ब्रिटिश सरकारने स्वातंत्र्य देऊ केले, पण ते देशाची फाळणी करून.

  • जवाहरलालजींनी ते नाइलाज म्हणून स्वीकारले.

  • १५ ऑगस्ट १९४७ ला सर्वानुमते ते स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले.

  • परंतु ३० जानेवारी  १९४८ रोजी गांधीजींची हत्या झाल्याने ते व्यथित झाले.

  •  पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे १७ वर्ष पंतप्रधान होते.  

  • भुवनेश्वरच्या काँग्रेसच्या अधिवेशनात त्यांना हृदयविकाराचा पहिला झटका आला, पण ते त्यातून वाचले.

  • परंतु २७ मे १९६४  ला त्यांना पुन्हा हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच ते स्वर्गवासी झाले.

  • आपल्या कारकिर्दीत जवाहरलाल नेहरू यांनी भारताला वैज्ञानिक व आर्थिक नियोजन या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी दिल्या.

  • १९६२ मध्ये चीनने केलेल्या आक्रमणामुळे त्यांच्या मनाला फार मोठा धक्का बसला आणि असे म्हटले जाते की, त्यामुळेच त्यांचा लवकर मृत्यू झाला.


टिप्पण्या