मुघल बादशहा अकबर...

  • अकबर (१५५६ ते १६००)--

  • जन्म- १५ ऑक्टोबर १५४२, अमरकोट.

  • अकबराच्या जन्माच्या वेळी त्याच्या वडिलांची म्हणजेच हुमायुनची अवस्था अतिशय वाईट होती.

  • अशाही परिस्थितीत हुमायूनने अकबराच्या शिक्षणाची चांगली व्यवस्था केली होती.

  • बैरामखानास अकबराचा शिक्षक आणि संरक्षक म्हणून नेमले होते.

  • हुमायुनच्या मृत्यूनंतर बैरामखानाने १४ फेब्रुवारी १५५६ रोजी अकबराचा राज्याभिषेक करून त्यास बादशहा पदावर आरुढ केले. 

  • अकबर बादशहा झाला, तेव्हा त्याच्याकडे सुसंघटित लष्कर नव्हते, पैसा नव्हता, फारसे प्रदेशही ताब्यात नव्हते, राजकीय परिस्थिती प्रतिकूल होती. 

  • अशा परिस्थितीत बहरामखानाने त्याला चांगला आधार दिला.

  • त्याच्याच सहकार्याने अकबराने भारतात मुघल साम्राज्य स्थिर व भक्कम केले.

  • पानिपतची दुसरी लढाई अकबर आणि हेमू यांच्यात १५५६ मध्ये झाली.

  • बादशहा म्हणून अधिकारावर आल्यानंतर १५५६ ते १५६० पर्यंत बहरामखानाच्या मार्गदर्शनाखाली दिल्ली, आग्रा, पंजाब, ग्वाल्हेर, जौनपूर व चुनार या प्रदेशात मोगल सत्ता स्थिर करून त्यानंतर अकबराने आपले लक्ष उत्तर भारताकडे  वळवले.

  • उत्तर भारतातील मोहिमा-

  • अकबर सामर्थ्यशाली, पराक्रमी असल्याने लवकरच त्याने साम्राज्यविस्ताराचे धोरण आखून हिंदू व मुसलमानांची स्वतंत्र राज्य जिंकून घेतली.

  • माळव्यातील बाझबहाद्दूरची सत्ता संपुष्टात आणली.

  • जौनपूर व चुनार येथील बंडाचा बीमोड केला.

  • जयपूरच्या राजाने अकबराची भेट घेऊन आपली मुलगी जोधाबाई हिचा विवाह १५६२ मध्ये अकबराशी लावून संबंध दृढ  केले. 

  • अशाप्रकारे जयपूर आपल्या प्रभावाखाली आणला.

  • गोंडवनात गोंड लोकांचे एक लहानसे राज्य होते.

  • राणी दुर्गावती गोंडवनचा कारभार पाहत होती.

  • साम्राज्य विस्तारासाठी अकबराचे लक्ष गोंडवनाकडे गेले.

  • गोंडवन जिंकून घेण्यासाठी आसफखानाला पाठवले. 

  • राणी दुर्गावती व मोगल यांच्यात युद्ध होवून राणी दुर्गावतीचा पराभव झाला.

  •  विटंबना टाळण्यासाठी तिने आत्महत्या केली.

  • त्याबरोबरच मोगलांनी गोंडवन ताब्यात घेऊन आपल्या साम्राज्याला जोडले.

  • अकबर प्रबळ साम्राज्यवादी शासक होता.

  • कालांतराने बहरामखानाच्या वर्चस्वातून सुटका मिळवून पुढे अंतःपुरातील स्त्रियांचे वर्चस्व झुगारून अकबराने विविध प्रदेश पादाक्रांत करण्यासाठी मोहिमा काढल्या.

  • मुजुमदार राय चौधरी व दत्त यांच्या मते, "वस्तुतः ४० वर्षात अनेकदा इतर राज्यांना आपल्या साम्राज्यात विलीन करताना त्याने जवळजवळ संपूर्ण उत्तर व मध्य भारताचे राजकीय एकीकरण केले."

  •  डॉ. ईश्वरीप्रसाद लिहितात, अकबराच्या दिग्विजयास तीन भागात विभक्त केले जाऊ शकते.

१. उत्तर भारतावरील विजय (१५५८ ते १५७६ ) 

२. वायव्येकडील विजय  (१५८० ते १५९६)    ३. दक्षिणेकडील विजय (१५९८ ते १६०१ ) 

  • त्याच्या साम्राज्याचा प्रसार सुरुवातीच्या कारकीर्दीतच म्हणजेच १५५८ ते १५६०  याकाळात घडून आला.

  • त्याने ग्वाल्हेर, अजमेर, जौनपूर त्याने घेतले.

  • सन १५६१-६२ मध्ये त्याने माळवा व मेवाडवर विजय मिळवला.

  • त्यानंतर  चितोडचा राजा उदयसिंह व अकबर यांच्यात हळदीघाटची लढाई होवून अकबराने चितोड ही इ.स.१५६८ (१५७६) मध्ये जिंकून घेतले.

  • दक्षिण भारतातील मोहिमा (१५९५ ते १६०१):

  • इ.स.१५९५  पर्यंत उत्तर हिंदुस्तान ताब्यात घेतला.

  •  त्यानंतर अकबराचे लक्ष दक्षिण भारतावर केंद्रित होऊन दक्षिणेतील अहमदनगरच्या सत्तेविरूद्ध संघर्ष करून २८  ऑगस्ट १६०० रोजी अहमदनगरचा किल्ला जिंकून घेतला.

  • त्यानंतर ६ जानेवारी १६०१ रोजी खानदेशच्या प्रदेशावर मोगलांनी नियंत्रण प्रस्थापित केले.

  •  अशा प्रकारे दक्षिणेकडील खानदेश, वर्‍हाड, अहमदनगर ही राज्ये जिंकून घेतली.

  • त्यानंतर अकबराने सम्राट ही उपाधी धारण केली.

  • राजपूतविषयक धोरण :

  • अकबर अतिशय धूर्त व मुत्सद्दी होता.

  •  राजपुतांच्या सहकार्याशिवाय हिंदुस्थानात आपले साम्राज्य निर्माण होणे अशक्य आहे, हे लक्षात ठेवून अकबराने रजपूतांविषयी उदार धोरण स्वीकारून त्यांच्याशी सहकार्याने वागायचे ठरवले.

  •  एवढेच नाही तर रोटी-बेटी व्यवहार करून राजपूत कन्या जोधाबाई हिच्याशी विवाह केला.

  •  अकबराने रजपुतांना मानसन्मान व अधिकार पदे ही दिली.

  •  राजा मानसिंह, राजा भगवानदास, राजा बिरबल राजा तोडरमल इत्यादी राजपुतांना अधिकारपदे दिली.

  •  राजपुतांची राज्ये त्यांच्याकडेच ठेवून त्यांना मांडलिकत्व स्वीकारण्यास भाग पाडले.

  • एकापाठोपाठ अनेक रजपूतांनी अकबराचे मांडलिकत्व स्वीकारले.

  • त्याला राणाप्रताप अपवाद होता. अखेर हळदीघाटच्या लढाईत राणा प्रतापचा पराभव झाला.

  •  याच राजपुतांच्या मदतीने अकबराने अनेक विजय मिळवले. राजपुतांना मानसन्मान दिला.

  • अकबराने फत्तेपूर सिक्री येथे राजधानी वसवली.

  • अकबराचे धार्मिक धोरण-

  • सर्व धर्मात सत्यांश आहे असे अकबराचे ठाम मत बनले होते. 

  • इतर धर्मातील तत्त्वांनी आकृष्ट झाला.

  • ख्रिस्ती धर्मातील उपासना विधींना तो उपस्थित राहू लागला. 

  • पारशींची सूर्योपासना त्याने केली.

  •  हिंदूंच्या जन्म-मरणाच्या फेऱ्यांवर त्याची श्रद्धा बसली.

  • जगातील कोणताच एक धर्म त्याला अध्यात्मिक शांती देऊ शकला नाही, म्हणून त्याने सर्व धर्मातील चांगली तत्त्वे एकत्रित करून दिन-ए-इलाही हा नवीनच धर्मपंथ स्थापन केला व स्वतः त्याचा प्रमुख बनला.

  • अकबराने हिंदूंवरील 'जिझिया कर' बंद केला.

  • अनेक धर्मांची तीर्थस्थाने पुन्हा गजबजून गेली.

  • अनेक धर्मातील साधूंचा स्वतः अकबराने सन्मान केला.

  • हिंदूंना प्रशासनात समाविष्ट करून घेतले.

  •  अकबराने हिंदू कवी, विद्वान, संगीततज्ञ व चित्रकारांना ही प्रोत्साहन दिले.

  • हिंदू-मुस्लिम यांच्यातील यापूर्वीची दरी कमी होऊ लागली.

  •  'एका दृष्टीने अकबर हा भारतीय एकराष्ट्रीयत्वाचा जनक होऊन गेला असे म्हणता येईल.' असे उद्गार पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काढले आहेत.

  • भारताचे सामर्थ्य हिंदू-मुस्लिम ऐक्यात आहे हे ओळखणारा अकबर हा द्रष्टा सम्राट होऊन गेला.

टिप्पण्या