मल्हारराव होळकर यांची पुण्यतिथी - २० मे...

 

  • मल्हारराव होळकर यांची पुण्यतिथी - २० मे

  • जन्म - १६  मार्च  १६९४

  • मृत्यू -  २०  मे    १७६६  

  • मल्हारराव होळकर यांचा जन्म भटक्या धनगर मेंढपाळ कुटुंबात १६ मार्च १६९४ ला झाला होता.

  • मल्हारराव होळकर यांचे पूर्वज खानदेशातले वाम या गावी राहत. 

  • नंतर ते पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील नीरेच्या काठी 'होळ' या गावी स्थायिक झाले.

  • त्यावरून त्यांना होळकर किंवा वायूगावकर असे म्हणत. 

  • भोजराज मामांची मुलगी गौतमी हिच्याबरोबर त्यांचा विवाह झाला.

  •  त्यांना खंडेराव हा एक मुलगा होता.

  • मल्हारराव आपल्या पराक्रमाने, घराणेशाहीची कसलीही परंपरा नसतांना, स्वबळावर पुढे येत, पुढे मराठेशाहीचे आधारस्तंभ बनले.

  • ते एक धोरणी, मुत्सद्दी व शिवरायांच्या गनिमी काव्याला अंगीकारणारे सेनानी होते.

  • अंगी गुण असले, वीरश्री असली तर सामान्य धनगर मुलगा कसा बनू शकतो, हे मल्हाररावांनी सिध्द करून दाखवले.

  • गनिमी कावा आणि मुत्सद्देगिरीच्या जोरावर उत्तर हिंदुस्थानात त्यांचा मोठा दबदबा निर्माण झाला होता.

  • मल्हारराव सुरुवातीला खानदेशातील कंठाजी कदमबांडे यांच्या सैन्यात होते.

  • पहिल्या बाजीरावाने त्यांचे कौशल्य हेरून आपल्या पदरी ठेवले आणि त्यांच्या खर्‍या उत्कर्षाला प्रारंभ झाला.

  • सन १७४५ पर्यंत त्यांच्या ताब्यात ७४|| लक्षांचा मुलूख होता. 

  • मल्हाररावांनी इंदौर येथे राजधानी करून अनेक धनगर कुटुंबे ऊर्जितावस्थेत आणली.

  • मल्हारराव केवळ शिपाईगडी नव्हता.

  • धर्मरक्षण, विद्येस उत्तेजन, मंदिरांची निर्मिती, इंदौर शहराचा विकास याकडेही त्यांनी लक्ष दिले. 

  • दुर्दैवाने खंडेराव हा मल्हाराव होळकर यांचा मुलगा १७५४ मध्ये कुंभेरी येथे सुरजमल जाटाबरोबरच्या लढाईत ठार झाला.

  • पुत्रवियोगाचे दुःख पचवून त्यांनी अनेक  मोहिमा उघडल्या. 

  • मोगली सरदार नजीबखानाने केलेल्या चुका अनेकदा पोटात घातल्या. त्याला मोकळे सोडून दिले.

  •  त्यांच्या याच कृतीने त्यांचा घात झाला. पुढे याच नजीबखानाने अब्दालीला बोलावून पानिपतचे युद्ध घडवून आणले.

  •  'शीर सलामत तो पगडी पचास' या न्यायाने वागणा-या मल्हाररावांनी पानिपतच्या तिसऱ्या युद्धाच्या वेळी पेशव्यांना गनिमी काव्याने युद्ध करण्याचा सल्ला दिला. 

  • त्यावरून सदाशिवराव भाऊंशी मल्हाररावांचे मतभेद झाले.

  • मात्र त्याकडे दुर्लक्ष केले गेले आणि मराठ्यांना पानिपतावर मोठा पराभव स्वीकारावा लागला.

  • मल्हारराव होळकर गनिमी काव्याचे कट्टर पुरस्कर्ते होते.

  • पानिपतच्या रणांगणातून कसाबसा जीव वाचवून परत ते आले. 

  • पराभवाचे शल्य बोचत असतानाच सप्टेंबर १७६१ मध्ये त्यांची पत्नी गौतमीबाई यांचे निधन झाले. त्यामुळे मल्हारराव आणखीनच खचले. 

  • बादशहाचे सर्व सरदार, वजीर मल्हारराव आणि राणोजी यांना टरकून असायचे.

  • अब्दालीच्या तीन स्वाऱ्या झाल्यानंतर मराठे बादशहाचे रक्षण करू शकतात, असा विश्वास बादशहाच्या मनात निर्माण झाला.

  • मुलगा खंडेरावाच्या मृत्यूनंतर प्रजाहित व दौलतीचा सांभाळ करण्यासाठी सासरे मल्हारराव यांनी सून अहिल्याबाईंना सती जाऊ दिले नाही. 

  • अहिल्याबाईंची राजकारणातील समज पाहून ते त्यांच्याशी अनेकदा सल्लामसलत करीत असत.

  • पेशव्यांकडून इंदौर संस्थानची जहागिरी मिळवून, त्यानंतर २० मे १७६६ मध्ये मल्हाररावांचा मृत्यू झाला.



टिप्पण्या