पानिपतचे पहिले युद्ध : २१ एप्रिल १५२६
बहलोल लोदीने अल्लाउद्दीन आलमशहाची उचलबांगडी करून दिल्लीमध्ये लोदी करण्याची स्थापना केली.
बहलोलच्या मृत्यूनंतर १७ जुलै १४८९ रोजी त्याचा मुलगा निजामखानने स्वतः सुलतान घोषित करून सिकंदरशहाचा किताब धारण केला.
सिकंदर लोदीच्या मृत्यूनंतर त्याचा ज्येष्ठ पुत्र इब्राहिम हा २१ नोव्हेंबर १५१७ रोजी सिंहासनारूढ झाला.
त्याने धाकटा बंधू जलालखान याचा वध केला.
अनेक अफगाण सरदारांची मुस्कटदाबी केली. असभ्य वर्तन केले. त्यामुळे इब्राहीमविरुद्ध उद्रेक सुरू झाला.
इब्राहिम लोदीचा चुलता आजमखानदेखील दिल्लीची गादी बळकावण्याचे स्वप्न साकार करण्याच्या प्रयत्नात होता.
अशा परिस्थितीत आजमखान व दौलतखान यांनी काबूलचा सम्राट बाबरला भारतावर स्वारी करण्यास आमंत्रित केले. त्यामुळे बाबर दिल्लीकडे अग्रेसर झाला.
दिल्ली येथे इब्राहिम लोदी राज्य करत होता.
बाबराने प्रथम पंजाब जिंकून घेतला.
ही बातमी इब्राहिमला समजताच त्याने बाबराला रोखण्याचा प्रयत्न केला.
परंतु इब्राहिम लोदीच्या स्वभावामुळे त्याला अनेक शत्रू निर्माण झाले होते. ठिकठिकाणी बंडाळी निर्माण झाली होती.
इब्राहिम लोदीने एक लाख शिपायांसोबत लढा देण्याची जय्यत तयारी केली.
फेब्रुवारी १५२६ रोजी उडालेल्या पहिल्या चकमकीत खान व इतर अफगाणांना पराभूत करून अटक केली.
बाबराचा मुलगा हुमायूनने फिरोजवर ताबा मिळवला. बाबर शहाबादला पोहोचला.
यमुना ओलांडून बाबराने सरसावा या स्थळी तळ दिला.
१ एप्रिल १५२६ रोजी बाबराच्या एका लष्करी तुकडीने स्वारी करून खानास यमसदनी पाठवले.
त्यामुळे लोदी शिपायांमध्ये दहशत निर्माण झाली.
अशा प्रकारे तयारी करून बाबर १२ एप्रिल १५२६ रोजी पानिपतच्या प्रसिद्ध मैदानात येऊन धडकला.
पानिपतच्या मैदानात उभय पक्षांच्या सैन्याने समोरासमोर तोंड दिल्यावरही कोणत्याही पक्षाने आठ दिवसापर्यंत लढाई सुरू केली नाही.
बाबराने याप्रसंगी उत्तम रचना केली. मोर्चेबंदी करताना बाबराने सैन्य उजव्या बाजूला पानिपत गावापर्यंत पसरवले, तर डाव्या बाजूला मुक्त व सुरक्षित ठेवले.
सर्वत्र खंदक खोदून फांद्या व मातीने त्यांना झाकण्यात आले.
समोर तोफखाना जमविण्यात आला.
विशिष्ट अंतरावर घोडेस्वारांच्या तुकड्या, बैलगाड्यांची ओळी ठेवण्यात आली.
उजव्या व डाव्या बाजूस बाबराने आपला पक्ष भक्कम केला.
बाबर मध्यस्थानी होता, इब्राहीम लोदीने सुमारे एक लाख शिपायांना अग्रभागी दल, केंद्रीय दल, उजवीकडे सैन्य व डावीकडे रक्षा दल या पद्धतीने तैनात केले होते.
२० एप्रिल रोजी उभय पक्षाचे सैनिक आगेकूच करू लागले.
२१ एप्रिल सकाळी दोन्ही पक्षात घनघोर युद्ध सुरू झाले, बाबराने सुव्यवस्थितपणे युद्धाचा सुपुत्र भात केला तर अफगाण पूर्णपणे नियंत्रित व संघटित होते.
इब्राहीम लोदी सैनिकांसोबत द्रुतगतीने पुढे चालून आल्यावर गाड्यांच्या ओळीसमोर त्यास थांबावे लागले.
बाबराने त्याचा फायदा घेतला. दुर्गामाता लाच मागे वळून लोदीच्या मागील सैन्यावर तुटून पडण्याचा आदेश दिला.
एकीकडे बाणांचा वर्षाव तर दुसरीकडे तोफांचा भडीमार यामुळे त्याचे सैन्य कोंडीत सापडले.
सर्व पठाण मध्यभागी अडकले. किंमत त्यांना संपेपर्यंत इब्राहिमचे चाळीस-पन्नास हजार शिपाई युद्धात मारले गेले
ताहीर इब्राहीमचे डोके शोधून काढले. सर्वशक्तिमान ईश्वराच्या अपार कृपेने या युद्धात विजय मिळाला, असा उल्लेख बाबराने केला आहे.
याप्रमाणे बाबरापेक्षा सुमारे पाच पटीने विशाल असणाऱ्या इब्राहिमच्या शिपायांचा पानिपतच्या प्रसिद्ध संग्रामात पराभव झाला.
डॉ. ईश्वरीप्रसादच्या मते, "पानिपतचा रणसंग्रामामुळे दिल्लीचे साम्राज्य बाबराच्या हाती आले. लोदीची शक्ती नेस्तनाबूत झाली व हिंदुस्थानचे साम्राज्य चगताई तुर्कांकडे गेले."
रशबुक्र विलियमच्या मते, "बाबराचे निराश्रित जीवन संपुष्टात आले, तो एका निश्चित भूभागाचा स्वामी बनला."
बाबराने पानिपतच्या पहिल्या युद्धाच्या वेळी रुमी-युध्दतंत्राचा अत्यंत प्रभावीपणे वापर केला होता.
बाबराची युद्धरचना तुलुगामा युद्धतंत्राची होती.
इब्राहीम लोदीची युद्धरचना पारंपरिक होती.
बाबराजवळ शिस्तबद्ध सैन्य, घोडदौड व तोफखाना होता. बंदुका होत्या. राखीव सैन्य होते, तर इब्राहिम लोदीजवळ प्रचंड सैन्य होते. घोडदळ, पायदळ व हत्ती होते.
परंतु प्रत्यक्ष लढाईत बाबराच्या तोफांनी लोदीच्या सैन्यातील हत्ती जखमी होऊन पळत सुटले.
परिणामी लोदीच्या सैन्यात गडबड उडाली. त्याचाच फायदा बाबराच्या सैन्याने घेऊन इब्राहीम लोदीचा दणदणीत पराभव केला.
दिल्लीतील सुलतानशाहीचा शेवट झाला व दिली मोगलांच्या ताब्यात गेले.
अशाप्रकारे भारतात मोगल साम्राज्यास सुरुवात झाली.
खानुआची लढाई: १७ मार्च १५२७
बाबरने पानिपत विजयानंतर दिल्ली आणि आग्रा जिंकून दिल्लीत प्रवेश केला व स्वतःला भारताचा बादशहा म्हणून घोषित करून गादीवर बसला.
अर्थात बाबराच्या ताब्यात थोडाच प्रदेश होता. बाबराला अनेक विरोधक होते.
विशेषतः राजपुतांना असे वाटले की, बाबर दिल्ली जिंकून लुटालूट करून परत जाईल.
परंतु बाबर दिल्लीतच राहिल्याने राणासंगाच्या नेतृत्वाखाली राजपूत व बाबर यांच्यात संघर्ष झाला.
त्यातूनच आग्र्याजवळ खानूआ येथे १६ मार्च १५२७ रोजी राजपूत व बाबर यांच्यात युद्ध झाले.
यावेळीही बाबराने तुलुगामा युद्धतंत्राचा अवलंब करून राणासंगाचा पराभव केला.
राणासंगची युध्दरचना पारंपारिक होती. सुरुवातीला राजपुतांना यश मिळाले, परंतु ते त्यांना अखेरपर्यंत टिकविता आले नाही.
राजपुतांच्या पराक्रमाची कल्पना बाबरला असल्यानेच, त्याने आपल्या सैन्यात उत्साह निर्माण करून या युद्धाला जिहादचे स्वरूप दिले.
परिणामी बाबरचे सैन्य राजपुतांवर तुटून पडले. तशातच राणासंग जखमी होऊन पडल्याने राजपूत सैन्याचे मनोधैर्य खचू लागले.
त्याचाच फायदा घेऊन बाबराने राजपुतांची कत्तल सुरू केली.
अशा प्रकारे राजपुतांचे दिल्ली प्राप्तीचे स्वप्न नष्ट झाले.
याच वेळी बाबराने स्वतःला गाझी ही पदवी धारण केली.
अशाप्रकारे खानुआ लढाईत राजपूतांचा पराभव करून मोगल सत्ता अधिक सुरक्षित झाली.
पुढे बाबरने मेवाड जिंकून घेतला. सन १५२८ मध्ये मोहिनी राय या राजपूत प्रशासकाचा पराभव करून चंदेरी जिंकून घेतले.
६ मे १५२९ रोजी घाग्रा (बक्सार) येथे झालेल्या निर्णायक युद्धात बाबराने अफगाणांचे पारिपत्य केले.
याप्रमाणे डिसेंबर १५३० मध्ये बाबराच्या मृत्यूपूर्वी त्याने हुमायुनसाठी विशाल मोगल साम्राज्याचा वारसा निर्माण केला होता.
त्याचे साम्राज्य मध्य अशियातील वंशु नदीपासून तर बिहारपर्यंत पसरले होते.
उत्तरेकडील पर्वतापासून तर माळवा राजपुतानापर्यंत ते उत्तर-दक्षिण भागात पसरले होते.
बाबराने पानिपत व घाग्राच्या लढायांमध्ये अफगाणांचा दारुण पराभव केला असला, तरी त्यांचे पूर्णपणे उच्चाटन झाले नव्हते.
हुमायुन गादीवर बसल्यावर (१५३०-४०) त्याच्याकडून वेळोवेळी ज्या चुका झाल्या, त्याचा फायदा शेरशहा सूर याने घेतला.
शेरशहाने सन १५४०-४५ या पाच वर्षाच्या शासन काळात अत्यंत उपयुक्त अशा सुधारणा कार्यान्वित केल्या.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा