बाबराचे आक्रमण व भारतात मुघल साम्राज्याची स्थापना...

 

  • मुघल (मोगल) साम्राज्य :

   

  • बाबराचे आक्रमण व भारतात मुघल साम्राज्याची स्थापना-

  • बाबर- जहिरुद्दीन महंम्मद बाबर

  • जन्म : १४ फेब्रुवारी १४८३

  • मृत्यू : ३० डिसेंबर १५३०

  • दिल्लीच्या गादीवर पठाण वंशीय लोदी घराणे होते. 

  • त्याचवेळी दक्षिणेत दख्खन बहामनी राज्याचा तर दक्षिण विजयनगर साम्राज्याच्या प्रभावाखाली होते. 

  • इतरत्र अनेक छोटी-छोटी हिंदू तर कोठे मुस्लीम राज्य विखुरलेली होती. 

  • १५ व्या शतकाच्या अखेरीस युरोपियन व्यापाऱ्यांचे पाय भारतीय भूमीला लागले.

  •  त्यांच्या आगमनाने उपखंडातील भूमीबरोबरच आता येथील समुद्र व  किनारपट्टीही महत्त्वपूर्ण ठरू लागली.

  • भारतीय उपखंडातील घडामोडींवर मध्य व पश्चिम आशियातील घडामोडींचा प्रभाव फार पूर्वीपासूनच जाणवत होता.

  • म्हणजेच दिल्लीची सुलतानशाही तुर्की, अफगाणी, पठाण अशा विविध वंशीयांचे राज्य जवळजवळ ३०० वर्ष होते.

  • त्याचा शेवट एका मंगोल वंशीय आक्रमकाने घडवून आणला.

  • हा आक्रमक म्हणजे ट्रान्स ऑक्सियना या परिसरातील फरघाना या लहानशा राज्याचा राज्यकर्ता बाबर हा होय.

  •  त्याचा जन्म ४ फेब्रुवारी १४६३ मध्ये झाला. वयाच्या १४ व्या वर्षी फरघानाचा राज्यकर्ता झाला.

  •  वडील तैमूरलंगाच्या वंशाचे, तर माता चंगीझखानाच्या घराण्यातील. असा दुहेरी वारसा बाबराला लाभलेला होता.

  • भारतातील अफाट संपत्तीची आणि वैभवाची माहिती तसेच आकर्षण बाबरला होते.

  • बाबराने भारत जिंकून घेण्याचा निश्चय केला.

  • बाबराने भारतावर पहिली स्वारी इ.स.१५१९  मध्ये केली.

  •  इ.स.१५१९  ते १५२६ पर्यंत भारतावर पाच वेळा आक्रमण केले.

  • पाचव्या वेळेस पानिपत संग्रामात बाबरने इब्राहिम लोदीचा पराभव करून सुलतानशाही संपुष्टात आणून मुघल राजवट स्थापन केली.

  • इ.स. १५२५ मध्ये सर्व तयारीनिशी बाबर दौलतखान व राणासंग यांच्या आमंत्रणावरून भारताकडे निघाला.

  •  बाबराने तयारीनिशी दिल्लीवर चालून जाण्याची योजना आखली.

  • त्याची इब्राहिम लोदीशी पानिपतावर गाठ पडली.

  • बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यामध्ये इ.स. १५२६ मध्ये पानिपत येथे युद्ध झाले. त्यात बाबराचा विजय झाला.

  • बाबराच्या सैन्याने इब्राहिम लोदीचा दणदणीत पराभव केला.

  • बाबराने आपला चुलता अहमद मिर्झा याच्या मृत्यूनंतर फरघाना या आपल्या राज्यानजीकचे समरकंदचे राज्य जिंकून घेतले.

  • मात्र उझबेकचा प्रमुख शायबानीखान याने बाबरावर स्वारी करून त्याच्याकडून समरकंद तर मिळवलेच, पण बाबराला फरघाण्यातून हुसकावून लावले.

  • त्यानंतर बाबर काबूलला आला. त्याने गझनीचे राज्य जिंकून तेथे इ.स.१५०४ मध्ये आपले राज्य स्थापन केले.

  • बाबराने काबूल हेच आपले सत्ताकेंद्र निवडले व तो तेथे स्थिरावला.

  • आपल्या आत्मचरित्रात म्हणजेच 'बाबरनामा' मध्ये तो म्हणतो, काबुल घेतल्यापासून माझ्या मनात हिंदुस्थानवर आक्रमण करण्याचे होते.

  • आपल्या राज्यातील बंडाळी, आक्रमणे, हेवेदावे यांनी आपण कंटाळलो.

  •  तेव्हा येथून दूर तिकडे भारताकडे जाऊन स्वतंत्र असे राज्य स्थापावे, ही महत्त्वाकांक्षा बाबराने मनाशी बाळगली होती.

  •  मध्य आशियातील राज्यकर्त्यांची महत्वाकांक्षा असण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे, त्यांना भारतातील अन्नधान्य, अमाप संपत्ती, मुबलक पाणी यांचे सदैव आकर्षण होते.

  • बाबराचा पूर्वज तैमुर यांने भारतातून अमाप संपत्ती नेण्याबरोबरच येथून कलाकार, कारागीर घेऊन आपली राजधानी सुंदर आणि वैभवशाली केली होती.

  • येथील संपत्तीच्या लुटीतून तैमूरने आपले मध्य आशियातील प्रचंड साम्राज्य उभारले होते.

  • त्यांनी याच दृष्टीने पंजाब आपल्या ताब्यात पुढे एक वर्ष ठेवला होता.

  • अफगाणिस्तानमध्ये राज्य करणाऱ्या बाबरला पंजाब आपल्याच मालकीचा आहे, असे वाटत होते.

  • बाबराच्या काबूलच्या राज्याचे उत्पन्न अत्यंत अल्प होते.

  • अबुल फजल हा इतिहासकार लिहितो की, "बाबराने बदक्शन, कंधार आणि काबुल येथे राज्य स्थापन केले. पण त्याचे उत्पन्न अत्यंत नगण्य होते. 

  • खरे तर हे राज्य चालविण्यासाठी जे लष्कर लागावयाचे, त्याच्या खर्चापेक्षा उत्पन्न किती तरी कमी होते."

  • तोकड्या उत्पन्नातून आपले नोकर-चाकर, जात बांधव यांचे पगारसुद्धा भागत नव्हते.

  • त्यातच उझबेकांच्या स्वारीची शक्यता केव्हाही असे. 

  • भारतात जाऊन तेथे राज्य स्थापन करावे.

  • मग तेथून आक्रमक उझबेकांचा उपद्रव शांत करावा, अशी बाबराला उर्मी होती. 

  • त्याच्या महत्त्वाकांक्षेला व्यवहारात आणण्याजोगी योग्य राजकीय स्थिती त्यावेळी भारतामध्ये होती.

  • इ.स.१५१७ मध्ये  सिकंदर लोदीच्या मृत्यूनंतर इब्राहिम लोदी दिल्लीचा सुलतान झाला होता.

  • आपले राज्य बळकट करण्याची खटपट इब्राहिम करू लागला होता.

  • त्याने राजपुत आणि काबूल राज्यकर्त्यांना धोका संभवत होता.

  • याच दरम्यान दौलतखानाने आपला मुलगा दिलावरखानला बाबराकडे पाठवले.

  • त्याच्याकरवी इब्राहिमचा काटा काढण्यासाठी चालून येण्याचे आमंत्रण दिले.

  • नेमकी अशीच मागणी बाबराकडे राजपूत राजा राणासंग यानेही केली.

  • कदाचित इब्राहिम उन्मत झाला असण्याची शक्यता यावरून स्पष्ट होते.

  • या उत्साहवर्धक बातम्यांनी बाबराच्या मनातील भारतावर आक्रमण करण्याच्या इच्छेने उचल खाल्ली.

  • भारत नाही, निदान पंजाब तर मिळवावे, असे त्याला ठामपणे वाटू लागले.

  • दौलतखान व राणासंग यांच्या आमंत्रणावरून इ.स.१५२५ मध्ये तो भारताकडे निघाला. 

  • यावेळी इ.स.१५२६ मध्ये बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यात पानिपतचे पहिले युद्ध झाले.

  • पानिपतच्या पहिल्या युद्धात बाबराने इब्राहिम लोदीचा पराभव करून मुघल सत्तेची स्थापना केली. 

  • पानिपतचा हा संग्राम भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारा होता.

  • बाबरची भारतावरील स्वारी आणि त्याने स्थापलेल्या नव्या मुघल राजवटीची महती फार वैशिष्ट्यपूर्ण मानली जाते.

  • त्यानंतर आपली सत्ता मजबूत करण्यासाठी मेवाडचा राजा राणासंग याचा खानुआच्या लढाईत पराभव केला, तर घाग्रा येथील संग्रामात दौलतखानाचा व उरलेल्या शत्रूंचा पराभव केला. 

  • भारतातच राहण्याचा निर्णय घेताना बाबर म्हणतो, 'नको ती काबूलची उपासमारी, दारिद्र्य पुन्हा.'

  • अशाप्रकारे खानुआच्या लढाईत राजपूतांचा पराभव करून सत्ता अधिक सुरक्षित केली.

  • पुढे बाबरने मेवाड जिंकून घेतला.

  •  इ.स. १५२८ मध्ये मोहिनी राय या राजपूत प्रशासकाचा पराभव करुन चंदेरी जिंकून घेतले.

  • इ.स. १५२९  साली महंमद लोदीचा घाग्रा  येथील लढाईत पराभव करून बिहार ताब्यात घेतला.

  • अशाप्रकारे बाबराने इ.स.१५२६ मध्ये दिल्ली ताब्यात घेऊन इ.स. १५२९ पर्यंत हिंदुस्थानातील एकेक राज्य जिंकून घेऊन साम्राज्यविस्तार केला.

  • ३० डिसेंबर १५३० रोजी बाबराचा मृत्यू झाला.

  • बाबर स्वतः कुशल सेनापती व चांगला योद्धा होता.

  • त्याचे सैनिकांवर नियंत्रण होते, तसेच त्याला पर्शियन आणि तुर्की भाषा अवगत होत्या.

  • या दोनही भाषांमध्ये त्याने काव्यरचना केली. 

  • आपल्या आत्मचरित्रात त्याने भारताच्या राजकीय, सामाजिक तसेच भौगोलिक परिस्थितीचे वर्णन केले आहे. 

  • अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सर्व संकटांना तोंड देत बाबराने भारतासारख्या परक्या देशात मोगल सत्ता स्थापन करून मोगल साम्राज्याचे बीजारोपण करून साम्राज्यविस्तार केला. 

  • इ.स.१५३० मध्ये बाबराच्या मृत्युनंतर त्याचा मोठा मुलगा हुमायुन गादीवर आला.

टिप्पण्या