इयत्ता ११ वी - (इतिहास)l- प्रकरण १३

१३. भारत, श्रीलंका आणि आग्नेय आशिया

  • भारत आणि श्रीलंका -

प्रश्न - भारत श्रीलंका यांच्यातील सांस्कृतिक संबंधांचा आढावा घ्या.

      मुद्दे -    अ. ऐतिहासिक साधने        ब. सम्राट अशोकाचा कालखंड          क. बौद्ध सांस्कृतिक  ठिकाणे.

          अ.   ऐतिहासिक साधने -

  • प्राचीन काळापासून भारत आणि श्रीलंका यांचा इतिहास एकमेकांशी निगडित आहे. 

  • दीपवंश, महावंश आणि चुल्लवंश या ग्रंथामधून बुद्धपूर्व काळात  आणि  बुद्धोत्तर काळात भारतात आणि श्रीलंकेत होऊन गेलेले राज्य व त्यांचे परस्पर संबंध आणि घडलेल्या ऐतिहासिक घटनांची माहिती मिळते, म्हणून या ग्रंथांना  ‘वंशग्रंथ’  असे म्हणतात.

श्रीलंकेतील राजसत्ता -

  • वंशग्रंथांमध्ये दिलेल्या माहितीनुसार, इसवीसनाच्या सुमारे सहाव्या शतकात श्रीलंकेत स्थापन झालेल्या पहिल्या राज्याचे नाव ‘तांबपण्णी’ (ताम्रपर्णी) असे होते.

  • तो भारताच्या वंग-कलिंग राज्यातील युवराज होता. त्याच्या राज्यातून प्रथम सुप्पारक म्हणजे ‘सोपारा’ येथे आला आणि तेथून श्रीलंकेत पोचला.

ब. सम्राट अशोकाचा कालखंड  -

  • सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा प्रसार श्रीलंकेत करण्यासाठी पाठवलेला राजपुत्र थेर महेंद्र यांचे अनुराधपुर येथील मिहीनथले आगमन झाले. 

  • श्रीलंकेचा राजा ‘देवानामपिय तिस्स’  यास बौद्ध धर्माची दीक्षा दिली.

  •  त्याच्या धाकट्या भावाची पत्नी अनुला हिने भिक्खुणी होण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर थेर महेंद्र याने त्याची बहीण थेरी संघमित्रा हिला भारतातून बोलावून घेतले.

  • थेरी संघमित्राने भारतातून श्रीलंकेत येताना बोधीवृक्षाची एक फांदी  आणि बुद्धाचे काही अवशेष आणले.

  •  थेरी संघमित्राने राजाच्या धाकट्या भावाच्या पत्नीला म्हणजेच ‘अनुलाला’ बौद्ध धर्माची दीक्षा दिली. 

  • अनुला ही भिक्खुणी झालेली श्रीलंकेतील पहिली स्री होती. 

  • संघमित्राने श्रीलंकेतील पहिले भिक्खुणी शासन प्रस्थापित केले.

  • थेरी संघमित्राच्या आगमनाचे स्मरण म्हणून श्रीलंकेमध्ये दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या पौर्णिमेला ‘उंडुवप पोया’  नावाचा उत्सव साजरा केला जातो.

       क. बौद्ध सांस्कृतिक ठिकाणे -

  • थेर महिंद आणि थेरी संघमित्रा यांच्या अनुराधपुर जवळच्या मिहीनथले येथील वास्तव्यामुळे बौद्ध धर्म श्रीलंकेत रुजला आणि वाढला.

  • मिहीनथले उभारलेला ‘कंटकचेतीय’ हा प्राचीन स्तूप आहे.

  • थेर महिंद्राचा  अंबस्थल  दगाबा हा स्तूप मिहिनथले येथे आहे.

  • भगवान बुद्धांच्या अस्थीवरचा ‘थूपाराम’ स्तूप अनुराधपुर येथे आहे.

  • पोलन्नरुवा येथे बुद्धांच्या अस्थींची पुनर्स्थापना करून तिथे बुद्ध मंदिर बांधण्यात आले.

  • दांबूल्ल आणि सिगिरिया येथील बौद्ध लेणी व भित्तिचित्रे जागतिक सांस्कृतिक ठेवा आहेत.

  • संकल्पना चित्र पूर्ण करा.


            प्रश्न-  पोलन्नरुवा येथील बौद्ध मंदिराची माहिती लिहा.

  • भगवान बुद्धांचा अवशेष पोलन्नरुवाच्या  या मंदिराच्या मध्यभागी असलेल्या स्तूपात विराजमान आहे. 

  • स्तूपाच्या पायथ्याशी चंद्रशिला (अर्धवर्तुळाकृती) पायऱ्या आहेत. त्यावर हत्ती, घोडे व वेली यांच्या आकृत्या कोरल्या आहेत.

  • या मंदिरातील ‘गलपोथा’ हा एक वैशिष्ट्यपूर्ण अभिलेख आहे.

  •  ८.१७  मीटर लांबीच्या आणि  १.३९  मीटर रुंदीच्या अखंड शिलापट्टावर कोरलेल्या लेखात राजा निस्संक  मल्ल यांच्या कारकिर्दीचे वर्णन आहे. 

  • गलपोथाच्या एका बाजूस दोन हंसावलींच्या किनारींमध्ये गजलक्ष्मीची प्रतिमा कोरलेली आहे.

  • कॅंडी -

  • बुद्धांच्या अस्थींवर श्री दलद मलिगव मंदिर कवाली या नावाने ओळखले जाणारे दंतधातुचे सध्याचे  कॅंडी शहरात आहे.

  •  श्री दलद मलिगव मंदिर या मंदिराला युनेस्कोने जागतिक सांस्कृतिक वारशाचा दर्जा  लाभला आहे ; कारण गौतम बुद्धाचे दंत धातु  (अवशेष) त्याठिकाणी आहेत.

  • गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या अस्थींचे अवशेष भारतातील आणि बाहेरच्या देशांमधील बौद्ध संघ यांच्या हवाली करण्यात आले.

  •  अस्थींच्या या अवशेषांना ‘धातू’ असे म्हटले जाते.

  • दीघ निकाय’  या ग्रंथातील वर्णनानुसार गौतम बुद्धांचा डाव्या बाजूचा सुळा म्हणजेच दंतधातू कलिंग देशाच्या राजाला मिळाला.

  •  हा दंतधातू  पुढे श्रीलंकेत आला. ज्याच्याकडे दंतधातू असेल त्याला राज्य करण्याचा दैवी अधिकार आहे, अशी श्रद्धा श्रीलंकेतील राजघराण्यांमध्ये रुजली.q

  •  त्यामुळे सत्तेवर असलेल्या राजांनी तो आपल्या राजवाड्याच्या परिसरातच राहावा, यासाठी प्रयत्न केले. 

  • त्यामुळे दंतधातूचे स्थान सतत बदलत राहिले.


  • दांबुल्ला सिगिरिया -

  • श्रीलंकेतील दांबूल्ल येथील बौद्ध लेणी जागतिक सांस्कृतिक वारसा म्हणून जाहीर झालेली आहेत.

  •  याठिकाणी असलेल्या पाच लेण्याच्या अंतर्भागात गौतम बुद्ध आणि बोधिसत्व यांच्या मूर्तींबरोबर छतांवर काढलेली चित्रे आहेत.

  • दांबुल्ला शहराच्या जवळ असलेल्या ‘सिगिरिया’ येथील पर्वतावर एका प्रचंड मोठ्या खडकावर बांधलेला किल्ला आणि राजवाडा होता.

  • त्या खडकात राजवाड्याच्या प्रवेशद्वारापाशी कोरलेली सिंहाची एक प्रचंड मूर्ती आहे, त्यावरून या ठिकाणाचे नाव ‘सिगिरिया’ असे पडले.

  • सिगिरिया  येथील भित्तीचित्रांच्या शैलीची तुलना अजिंठा येथील भित्तिचित्र शैलीशी केली जाते.

  • भारत आणि आग्नेय आशिया -

  • आग्नेय आशियातील देश- (संकल्पना चित्र पूर्ण करा.)

(म्यानमार, थायलंड, लाओस, कंबोडिया, व्हिएतनाम, मलेशिया, इंडोनेशिया)

  • आग्नेय आशियात प्रस्थापित झालेल्या भारतीयांच्या वसाहती आणि राज्य यांची माहिती देणारे भारतीय साहित्य फारसे उपलब्ध नाही.

  •  मात्र चिनी सम्राटांच्या दरबारी नोंदीमध्ये या संदर्भातील माहिती उपलब्ध आहे. 

  • प्राचीन भारतीय साहित्यात -बौद्ध साहित्यात  ‘सुवर्णभूमी’  असा आढळतो.

  • दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ‘आग्नेय आशिया’ या संकल्पनेचा उदय झाला.

  •  आग्नेय आशियाचे दोन विभाग आहेत -

  1. मुख्य भूभाग- 

  • प्रदेशाचा उल्लेख इंडो-चीन या नावानेही केला जातो. 

  • म्यानमार, थायलंड, कंबोडिया,  लाओस, व्हिएतनाम हे देश आणि मलेशियाचा पश्चिम भाग यांचा समावेश होतो.

  1. समुद्री प्रदेश - 

  •  म्हणजेच मलाया द्विपसमूह. 

  • Aज्यामध्ये मलेशियाचा पूर्वभाग आणि इंडोनेशियाचा समावेश केला जात असला तरी, तेथे संस्कृती आणि इतिहास यांचा अभ्यास स्थानिक वैविध्य यांचा विसर पडणार नाही, याची काळजी घ्यावी लागते.

  • आग्नेय आशिया भारत यांच्यातील व्यापारी संबंध -

  • आग्नेय आशियातील देशांशी भारताचे व्यापारी संबंध इसवी सनापूर्वी पहिले शतक ते इसवी सनाचे पहिले शतक या काळात सुरू झाले.

  • भारतीय व्यापाऱ्यांसाठी मलाका सामुद्रधुनीमार्गे येऊन चिनी समुद्रात प्रवेश करण्यासाठी मलाया द्वीपकल्प हा सोयीचा बिंदू ठरला.

  • मलाया द्वीपकल्पाच्या पश्चिमेकडील किनार्‍यावर माल उतरवून तो पूर्व किनाऱ्याकडे नेणे आणि परत जहाजावर चढवणे,  हे संपूर्ण समुद्राला वळसा घालून जाण्यापेक्षा सोयीचे होते.

  •  समुद्रमार्गाने चालणारा हा व्यापार  इसवी सनाच्या दहाव्या शतकाच्या शेवटी चोळ  राजांच्या राजवटीत लक्षणीयरीत्या वृद्धिंगत झाला.

           प्रश्न -   भारतीय संस्कृतीचा आग्नेय  आशियात प्रसार झाला.              (सकारण स्पष्ट करा)       

  • आग्नेय  आशियातील देशांशी भारताचे व्यापारी संबंध इसवीसनपूर्व  १ ल्या शतकात सुरू झाले.

  • जहाजांवरून महिनोन् महिने प्रवास करणाऱ्या व्यापाऱ्यांबरोबर असलेल्या लवाजम्यात  पुरोहित, भिक्खू , धर्मगुरू आणि राजघराण्यातील महत्त्वकांक्षी व्यक्ती आग्नेय आशियात गेल्या.

  • या लोकांमार्फत आग्नेय आशियात भारतीय संस्कृतीचा प्रसार झाला.

  •  इतकेच नाही तर काहींनी तेथे स्वतंत्र राज्य प्रस्थापित केली. 

  • आग्नेय आशियात भारतीय संस्कृतीच्या खुणा आजही पहायला मिळतात.

  • म्यानमार -

  •  प्रश्न - म्यानमार आणि भारत यांमधील सांस्कृतिक संबंधांविषयी माहिती लिहा.  

  • म्यानमार हा भारताच्या सीमेलगत असलेल्या शेजारील देश आहे. पूर्वीचे नाव ब्रह्मदेश होते. 

  • इसवी सनपूर्व दुसऱ्या शतकात उत्तर आणि मध्य म्यानमारमध्ये ‘प्यू’ या नावाने ओळखली जाणारी नगर राज्य अस्तित्वात होती. 

  • त्यापैकी श्रीक्षेत्र हे विस्ताराने सर्वात मोठे राज्य होते. (ब्रिटिश काळात ‘प्रोम’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आणि सध्या ‘प्येइ’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शहराजवळ श्रीक्षेत्र हे नगर होते.) 

  • काही नगरे नव्याने वसली. त्यामध्ये हालीन आणि श्रीक्षेत्र हे महत्त्वाचे नगरे होती.

  • श्रीक्षेत्र राज्याचा संस्थापक असलेले दोन भाऊ हे गौतम बुद्ध यांच्या शाक्य कुळातील होते.

  •  इसवी सनाच्या पहिल्या शतकात पगान  (बगान)  हे राज्य उदयास आले.

  • अकराव्या शतकात त्याचे साम्राज्यात रूपांतर झाले आणि त्यात श्रीक्षेत्रसह सर्व  ‘प्यू’  नगरराज्य विलीन झाली. 

  • पगान साम्राज्याचा संस्थापक ‘अनव्रथ’ हा म्यानमारच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ र उत्तर व दक्षिण म्यानमारचे एकत्रीकरण केले.

  •  त्याच्या कारकीर्दीत आग्नेय  आशियात  क्षीण होत चाललेल्या थेरवादी बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन झाले.

  • यॉंगान ( रंगून) शहरात ६ व्या ते १० व्या शतकांच्या दरम्यान बांधला गेलेला स्वेडगॉन पॅगोडा हा म्यानमारमधील बांधणीचा उत्कृष्ट नमुना आहे.

  • म्यानमारमधील दोन व्यापारी बंधू भारतात आले असताना त्यांची गौतम बुद्धांची भेट झाली. त्यावेळी त्यांना गौतम बुद्धांच्या मस्तकाचे आठ केस मिळाले. 

  • मायदेशात केल्यानंतर हा अमूल्य ठेवा त्यांनी राजाच्या हवाली केला. 

  • तो जोपासण्यासाठी राजाने श्वेडगाॅन पॅगोडा बांधला. हा पॅगोडा सोन्याच्या पत्र्यांनी मढवलेला आहे.

  • भारत-म्यानमार सांस्कृतिक संबंधांची घनिष्ठता या वास्तूच्या निर्माणातून व्यक्त होते. 

  •  अकराव्या ते बाराव्या शतकात सम्राट क्यांंझिथ्था याच्या कारकीर्दीत बांधले गेलेले ‘आनंद मंदिर’ ही वास्तू भारतीय व पगान स्थापत्यशैलीच्या संमिश्र बांधणीचा उत्कृष्ट नमुना आहे.

  • ब्रिटिश राजवटीत ब्रह्मदेश भारतातील वसाहती साम्राज्याचा एक भाग होता.

  •  त्या कालखंडात प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेले सांस्कृतिक संबंध पुनर्प्रस्थापित झाले.

  • थायलंड -

  • प्राचीन काळी थायलंडचे रहिवासी त्यांच्या देशाचा उल्लेखमुएंग थाइ’ असा करत असत.

  •  मात्र बाहेरील जगामध्ये तो ‘सयामया नावाने ओळखला जात असे.

  •  २० व्या शतकात त्याचे नाव थायलंड असे बदलण्यात आले.

  • प्रश्न - थायलंडमधील भारतीय संस्कृतीचा प्रकार स्पष्ट करा.    (सविस्तर उत्तर लिहा)

  •  ६ व्या ते ११  व्या शतकात आशियातील थायलंडमध्ये मॉन लोकांचे द्वारावती नामक राज्य होते.

  • द्वारावती राजवटीच्या काळात थायलंडमध्ये भारतीय संस्कृतीचा प्रसार झाला. 

  • मॉन लोकांच्या संस्कृतीच्या घडणीमध्ये भारतीय शिल्प, साहित्य, नीतिशास्त्र व दंडनिती या क्षेत्रातील परंपरांचा मोठा वाटा होता.

  • थायलंडच्या इतर भागात झालेल्या विजयाचे श्रेय मॉन लोकांना आणि पर्यायाने भारताला दिले जाते.

  • थायलंडमध्ये लोप बुरी (लाओपुरी) आणि अयुथ्था  (अयोध्या) यासारख्या शहरांच्या जवळ द्वारावती कालखंडातील शिल्प आणि स्थापत्याचे अवशेष सापडले आहेत.

  • त्यावरून हे स्पष्ट होते की द्वारावती शिल्प शैलीवर भारतीय शिल्प शैलीचा प्रभाव होता.

  •  दक्षिणेतील चोळांच्या राज्यात ज्या  प्रकारची मंदिरे होती; त्यासारखे मंदिरे थायलंडमध्ये निर्माण करण्यात आली होती.

  • या अवशेषांमध्ये भगवान बुद्ध भगवान विष्णु यांच्या मुर्त्या वर्षी अवलंब सापडले होते.

  • कंबोडियातील शिल्पशैलीचा उगम द्वारावतीच्या शिल्पशैलीत म्हणजेच द्राविडी शिल्पशैलीत झाला असावा.

  •  १४  व्या शतकातील अयुथ्थ्या राजांच्या नावामागे ‘राम’ हा उपसर्ग जोडलेला दिसतो. त्याचे कारण रामचरित्राची थायलंडमधील लोकप्रियता हे आहे. 

  • थायलंडमध्ये रामायणाची स्वतंत्र परंपरा आहे. तिला ‘रामकीएन’  (राम आख्यान) असे म्हटले जाते.

  • रामकीएनमधील कथा व त्यातील मूल्ये थायलंडमधील शिल्पकला, नाट्यकला, नृत्यकला व लोकसंगीत या विविध कलांच्या माध्यमातून जपलेल्या आहेत.

  • व्हिएतनाम, लाओस आणि कंबोडिया

  • युरोपियन वसाहतींच्या काळात व्हिएतनाम, लाओस आणि कंबोडिया या तीन देशांना मिळून ‘इंडो-चीन’ असे नाव दिले गेले.

  • व्हिएतनाम -

प्रश्न -  फुनान  (व्हिएतनाम) ची माहिती लिहा.

  • हे व्हिएतनाममधील मेकॉंग  नदीच्या मुखाच्या प्रदेशातील प्राचीन राज्य होते.

  • फुनानची माहिती प्रामुख्याने चिनी साहित्यातून मिळते.

  • इसवीसनाच्या ३ ऱ्या शतकात चीनमध्ये ‘हानघराण्याची सत्ता लयाला जाऊन साम्राज्याचे तीन तुकडे झाले.

  •  त्यातील दक्षिणेकडच्या राज्याला रेशीम मार्गापर्यंत पोचण्यासाठी पर्याय उरला नाही.

  •  तेव्हा तेथील राजाने समुद्री मार्गाचा पर्याय शोधण्यासाठी काही लोक पाठवले.

  •  त्यांना मेकॉंग नदीच्या मुखाच्या प्रदेशात एक राज्य आढळले, त्यास त्यांनी  ‘फुनान राज्य’ असे नाव दिले. 

  •  फुनानमध्ये तटबंदी युक्त शहर, राजवाडा, प्रस्थापित करप्रणाली, कायदे लिखित, नोंदी करण्याची पद्धत आणि कौशल्यावर आधारित व्यवसाय करणारा कारागीर वर्ग होता. 

  • हवाई छायाचित्रणाच्या आधारे या वर्णनाला दुजोरा मिळाला आहे. 

  • फ्रेंच पुरातत्त्वज्ञ लुई मेलरे याने केलेल्या उत्खननामध्ये बांधकाम केलेल्या मंदिरांचे अवशेष, अलंकार घडवण्याचे कारखाने आणि राहण्याची घरे यांचे अवशेष येथे मिळाले.

  •  इसवीसनाच्या दुसऱ्या शतकातील रोमन नाणी ही मिळाली.

  • चंपा राज्य -               (टीप लिहा.)     २ गुण.

  • व्हिएतनामच्या किनारी प्रदेशात ‘चंपा’ हे प्राचीन राज्य होते. 

  • चंपा म्हणजे चामवंशीय लोकांचे राज्य होय.

  • विजय हे शहर चंपाची राजधानी होते. 

  • तेथील इतर शहरांची नावे इंद्रपुर, अमरावती, कौठार, पांडुरंग अशी होती. 

  • चंपा राज्यात अनेक ठिकाणी ब्राम्ही लिपीत कोरलेले संस्कृत शिलालेख मिळतात.

  •  या शिलालेखांमध्ये तेथे राजे व राण्या यांची नावे आणि त्यांनी बांधलेल्या हिंदू देवतांच्या मंदिरांचे विशेषतः शिवमंदिराचे उल्लेख सापडतात. 

  • त्याचबरोबर लाकडी बुद्धमूर्ती ही मिळाल्या आहेत.

  •  त्यावरून व्हिएतनाममध्ये व्यापारी केंद्र असलेली फुनानसारखे इतर नगरराज्य अस्तित्वात होते आणि तेथून विविध वस्तूंची आयात निर्यात होत असे हे स्पष्ट होते.

  • इसवी सनाच्या  ४  थ्या ते १४ व्या शतकात चंपा राज्यातील शिवमंदिरे माइ सान नगरीमध्ये बांधली गेली.

  •  त्यातील भद्रेश्वर मंदिर महत्त्वाचे समजले जाते. 

  • या मंदिराची उभारणी मेरू पर्वताच्या संकल्पनेवर आधारलेली होती. 

  • या मंदिराच्या प्रांगणात संस्कृत आणि चाम भाषेत कोरलेल्या लेखांचे दगडी पट्टे आहेत.

  •  याच परिसरात राजघराण्यातील व्यक्तींचे दफन स्थळे परिसर राजघराण्यातील लोकांच्या धार्मिक प्रसंगांसाठी राखीव होता, असे दिसते. 

  • माइ सान येथील मंदिरांच्या परिसराला जागतिक सांस्कृतिक वारशाचा दर्जा लाभलेला आहे.

  • माइ सान येथे एकेकाळी  ७०  हून अधिक मंदिरे होती. 

  • माइ सानची मंदिर स्थापत्य शैली वैशिष्ट्यपूर्ण होती.

  • व्हिएतनाम, लाओस  आणि कंबोडिया या तीन देशांमध्ये सुमारे  २० वर्ष सुरू असलेल्या युद्धाला ‘व्हिएतनाम युद्ध म्हणून ओळखले जाते. 

  • या युद्धात माइ सानचा परिसर उद्ध्वस्त झाला.

  • लाओस -

  • प्रश्न - आग्नेय आशियातील ‘लाओस’ या देशाची माहिती लिहा.

  • लाओस हा देश भूवेष्टित आहे.

  •  लाओसचे अधिकांश लोक मूळचे दक्षिण चीनमधून आलेले ‘लाओ वंशा’चे आहेत.

  •  लाओसमधील राज्याचे नाव ‘लाओ सांग’ असे होते.

  •  हे राज्य इसवीसनाच्या  १४ व्या शतकापासून १८ व्या शतकापर्यंत अस्तित्वात होते.

  • १९  व्या शतकात थायलँडने केलेल्या आक्रमणापुढे लाओ सांगचा टिकाव लागला नाही. 

  • आग्नेय आशियातील इतर देशांप्रमाणेच लाओसमध्येही बौद्ध धर्म प्रमुख आहे.

  • तेथील सांस्कृतिक आणि साहित्यिक जीवनात बुद्ध चरित्र आणि रामायण यांच्याशी संबंधित प्रथांचा प्रभाव बघायला मिळतो.

  • १६  व्या शतकात लाओसमध्ये रचले गेलेले ‘सान सिनसे’ नावाचे एक महाकाव्य केवळ लाओसमध्येच नव्हे, तर थायलंडमध्ये ही लोकप्रिय आहे. 

  • ‘सान सिनसे’ आणि ‘रामायणा’च्या कथा सूत्रांमध्ये साम्य आहे.

  • कंबोडिया -

  • कंबोडियाचे प्राचीन नाव ‘कंबुजदेश’ असे होते. 

  • इसवीसनाचे  ८ वे  ते  १२ वे शतक या कालखंडात कंबोडियामध्ये मॉन आणि ख्मेर वंशाच्या लोकांचे राज्य होते.

  • ख्मेर साम्राज्याचा उदय कंबोडियामध्ये झाला. त्याचा इतिहास तेथील मंदिरांच्या प्रांगणामध्ये असणाऱ्या कोरीव लेखांच्या आधारे समजतो. 

  • लेख संस्कृत आणि ख्मेर भाषेत आहेत.

  •  सर्वप्रथम प्रस्थापित झालेल्या राज्याचे नाव चेन्ला असे होते.

  • चेन्ला राज्य -

  • कंबोडियामध्ये सर्वप्रथम प्रस्थापित झालेल्या राज्याचे नाव चेन्ला असे होते. 

  • चेन्ला येथील  लोक ‘ख्मेर’ वंशाचे होते. 

  • दुसरा जयवर्मन चेन्ला राज्याचा संस्थापक होता.

  • इसवीसन  ८०२  मध्ये त्याचा राज्याभिषेक झाला. 

  • राजधानीचे नाव हरीहरालय होते. 

  • चेन्ला राज्याच्या राजांनी पुढील ५०० वर्ष राज्य केले.

  •  व्हिएतनाम ते म्यानमार आणि उत्तरेला चीनपर्यंत साम्राज्यविस्तार केला. 

  • सातवा जयवर्मन या राजाच्या कारकिर्दीनंतर ख्मेर साम्राज्याला उतरती कळा लागली.

  • जगविख्यात अंकोरवाट हे विष्णू मंदिर बांधले.

  • अंकोरवट विष्णूमंदिर -

  • कंबोडियातील चेन्ला राज्याच्या दुसऱ्या सूर्यवर्मनने  यशोधरपूर या आपल्या राज्याच्या राजधानीत ११ व्या शतकात  ‘अंकोरवट’  हे विष्णू मंदिर बांधले.

  •  या मंदिराचे क्षेत्रफळ सुमारे ५००  एकर म्हणजेच दोन चौरस किलोमीटर इतके आहे.

  • मुख्य प्रवेशद्वार पश्चिमेला असून, मंदिराभोवती दोनशे मीटर रुंदीचा खंदक आहे. 

  • मंदिरातील कोरीव शिल्पांमध्ये आग्नेयकडील भिंतीवर असलेले समुद्रमंथनाचे शिल्प प्रसिद्ध आहे.

  • चंपाच्या राजाने अंकोरवटवर हल्ला करून या मंदिराचे बौद्ध मंदिरात रुपांतर केले.

  • सूर्यवर्मनचा मृत्यूनंतर काही वर्षांनी चंपाच्या राजाने अंकोरवटवर हल्ला केला आणि नासधूस केली.

  •  पुढे अंकोरवटचे रूपांतर बौद्ध मंदिरामध्ये झाले.


  • अंकोरथॉम -

  • चेन्ला राजवंशाच्या सातव्या जयवर्धन याने साम्राज्याची राजधानी स्थापन केलेले नगर म्हणजेच अंकोरथॉम.

  •   ७ व्या  जयवर्धनने बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता.

  • अंकोरथॉम शहराचे नियोजन, जलव्यवस्थापन आणि स्थापत्य यामध्ये ख्मेर शैलीची परिपक्वता दिसून येते. 

  • त्याच्या मध्यवर्ती ठिकाणी ‘बयोन मंदिर’ आहे. 

  • त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीसाठी प्रसिद्ध आहे.

  • ही शिखरे किंचित स्मित करणाऱ्या मानवी चेहऱ्याच्या आकाराची आहेत.

  • चेहऱ्यांची बांधणी अनेक दगड वापरून केलेली आहे.

  • बयोन मंदिर -

  • चंपाच्या राजाने अंकोवटची नासधूस केल्यानंतर,चेन्ला  राजा सातव्या जयवर्मन याने अंकोरथाॅम ही नवी राजधानी बांधली.

  • त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतर अंकोरथॉमचा मध्यवर्ती बिंदू म्हणजे बयोन मंदिर. 

  • हे मंदिर मेरू पर्वताचे प्रतीक आहे. 

  • मेरू पर्वताला रवीच्या-सूर्याच्या स्वरूपात मध्यवर्ती ठेवून समुद्रमंथन करणाऱ्या देव व दानव यांच्या शिल्पकृती मंदिराच्या दक्षिण प्रवेश मार्गाच्या दोन्ही बाजूंना निर्माण करण्यात आल्या.

  • अंकोरवट, अंकोरथॉम आणि त्यांच्या भोवतीचा परिसर हा युनेस्कोने जागतिक सांस्कृतिक वारसा म्हणून जाहीर केलेला आहे.

  • मलेशिया आणि इंडोनेशिया -

  • युरोपियन लोकांच्या आगमनाआधी मलेशियामध्ये तीन प्राचीन राज्य होऊन गेली.

  • वायुपुराणात मलय द्वीप या नावाने मलेशियन द्वीपकल्पाचा उल्लेख आढळतो.

  • मलायु -

  • आजच्या मलेशियाचा उल्लेख प्राचीन चीनच्या दरबारी दप्तरात ‘मलायु’ असा करण्यात आला आहे. 

  • तंजावर येथील बृहदीश्वर मन्दिरात त्याचा ‘मलैयुरअसा उल्लेख आहे.

  •  टॉलेमीने त्याचा उल्लेख  ‘मलेउ कोलान’ आणि  ‘गोल्डन केर्सनीझ’ (सुवर्णद्वीप) असा केला आहे.

  • चोळ राजा राजेंद्र यांनी पराभूत केलेल्या राज्यांपैकी ते एक राज्य होते.

  • श्रीविजय राज्य -

  • श्रीविजय राज्याचा उगम इंडोनेशियातील सुमात्रा बेटावर झाला. 

  •  श्रीविजय हे आशियातील सर्वात प्रबळ राज्य होते.

  • मलायू आणि त्याच्या शेजारची दुर्बल राज्य जिंकून श्रीविजय राज्याने साम्राज्यविस्तार केला. 

  • ११  व्या शतकातील चोळांच्या आक्रमणाला तोंड देताना  श्रीविजय राज्य दुर्बल झाले.

  • ‘इस्कंदर शाह’  याने मलायातील पहिल्या सुलतानशाही राज्याची स्थापना केली.

  • मजपहित -

  • १३  व्या शतकामध्ये पूर्व जावामध्ये मजपहित राज्य उदयाला आले. 

  • भारतीय संस्कृतीचा प्रभाव असणारे हे शेवटचे राज्य होते. 

  • विजय हा या राज्याचा संस्थापक होता. 

  • याने कुबलाई खानाला जावामधून हाकलून दिले.

  • इंडोनेशियातील जावा, बाली मजपहितचे अस्तित्व हळूहळू संपुष्टात आले.

  • शैलेंद्र राज्य -

  • जावामधील शैलेंद्र राज्याचे राज्यकर्ते भारतातून आले असावेत, असे प्रतिपादन काही भारतीय इतिहासकार करतात.

  •  इसवी सनाच्या ८ व्या आणि  ९ व्या शतकात शैलेंद्र सत्तेच्या भरभराटीचा काळ होता.

  •   बौद्ध धर्माचे अनुयायी असलेल्या शैलेंद्र राजांनी अनेक बौद्ध मंदिरे आणि स्तूप बांधले.

  •  मध्य जावातील बोरोबुदुरचा स्तूप स्थापत्य, शिल्पकला व बौद्ध तत्वज्ञानाची अभिव्यक्ती या सर्वच दृष्टीने अद्वितीय आहे.

  •  शैलेंद्र काळात मध्य जावामध्ये डिएंगच्या पठारावर बांधलेला हिंदू मंदिरांचा समूह ‘डिएंग मंदिरे’ ओळखला जातो.

  • मतराम -

  •  मतराम नावाची एक समकालीन  जावाच्या पूर्व भागात होती.

  • संजय नावाचा राजा या राज्याचा संस्थापक होता.

  • मतराम राजवटीत महाभारत व हरिवंश या ग्रंथांचे जावानीज भाषेत भाषांतर करण्यात आले. 

  • काकवीन नावाची जावानीज काव्यरचना ‘शार्दूलविक्रीडित’ सारख्या  संस्कृत वृत्तामध्ये बांधलेल्या आहेत.

  •  राजा दक्ष आणि प्रांबनान येथे हिंदू मंदिरे बांधली.

  •  त्यातील प्रमुख मंदिर ‘चंडी प्रांबनान  किंवा  चंडी लारा / रारा जोन्ग्रांग’ या नावाने ओळखले जाते.

  •  हे शिवाचे मंदिर असून त्यात दुर्गा देवीची सुंदर प्रतिमा आहे.

  • वायांग छायानाट्य -

  • वायांग  हा इंडोनेशियातील छायानाट्याचा खेळ आहे.

  •  हा खेळ विशिष्ट पद्धतीने बनवण्यात आलेल्या कातडी किंवा लाकडी पुतळ्या वापरून केला जातो.

  •  त्यात रामायण व महाभारतातील कथा सादर केल्या जातात. 

  • कलावंतांकडून रंगमंचावर सादर केल्या जाणाऱ्या नृत्यनाट्यालाही वायांग  असे म्हणतात.

  • प्रांबनान मंदिर -

  • इंडोनेशियात हिंदू विशेषतः शैव संप्रदायाची मंदिरे ही बांधली गेली.

  • त्यामध्ये प्रांबनान येथील मंदिर समूह खूप महत्त्वाचा मानला जातो.

  • या समूहातील मंदिरांना जागतिक सांस्कृतिक वारशाचा दर्जा देण्यात आलेला आहे.

  •  त्यातील प्रमुख मंदिर ‘चंडी प्रांबनान चंडी लारा/राज जोंग्रांग’ नावाने ओळखले जाते.

  •  मतरामचा राजा दक्ष याने बांधले.

  •  हे मंदिर शिवाचे असून त्यामध्ये दुर्गादेवीची एक सुंदर मूर्ती आहे.

  • तिला स्थानिक लोक ‘लारा जोंग्रांग’ असे म्हणतात.

  • बौद्ध तत्त्वज्ञानानुसार विश्‍वाच्या अस्तित्वाच्या तीन पातळ्या असतात.

  1. कामधातू  (इच्छारुपी बंध)   

  2. रूपधातु  (आकाररूपी आणि कामरूपी बंध)

  3.  अरूपधातू  (बंधमुक्तता)

  •  बोरोबुदुरच्या स्तूपाची रचना या तीन पातळ्यांच्या संकल्पनेवर आधारलेली आहे.

  •  पहिल्या दोन पातळ्यांवर क्रमाने लहान होत जाणारे चौथरे आहेत.

  •  प्रत्येक चौथऱ्याभोवती शिल्पाकृती असून कोनाड्यांमध्ये बुद्धमूर्ती आहे.

  •  अंतिम पातळीवर तीन वर्तुळाकृती चौथरे आणि त्यांच्या कडेने चाळीदार स्तूप आहेत. त्या स्तूपांच्या  आत बुद्धमूर्ती आहेत.

  •  सर्वात शेवटच्या वर्तुळाकृती चौथऱ्यावर भरीव स्तूप आहे.

  •  अत्यंत भव्य असा हा स्तूप इसवीसन ८००  च्या सुमारास बांधला गेला.

  • अशा रीतीने आपण भारताबाहेरील देशांमध्ये त्या त्या देशातील संस्कृतीच्या घडणीत भारतीय संस्कृतीने महत्त्वाची भूमिका बजावली, याचा इतिहास पाहिला. 

  • बौद्ध धर्माचा प्रसार आणि व्यापार यांच्यामुळे भारतीय संस्कृतीच्या भारताबाहेरच्या प्रसाराला सुरुवात झाली. 

  • त्या इतिहासाने इसवी सनाच्या सुरुवातीपासून मध्ययुगापर्यंतचा कालखंड व्यापलेला आहे.

















टिप्पण्या