इयत्ता १२ वी - इतिहास - प्रकरण - ९. जग निर्वसाहतीकरण

          प्रकरण- 9    जग: निर्वसाहतीकरण 

 प्रास्ताविक-

 निर्वसाहतीकरण  (टीप लिहा/  संकल्पना स्पष्ट करा.)

  •  वसाहतवाद्यांचे  वसाहतींवरील वर्चस्व संपुष्टात येणे आणि त्यांनी वसाहतींमधील स्थानिक लोकांच्या हाती सत्ता सुपूर्द करणे, यालाच  'निर्वसाहतीकरण' असे म्हणतात.

  • आशिया आणि आफ्रिका खंडातील निर्वसाहतीकरणाचा आढावा या पाठामध्ये आपण घेणार आहोत.

  •  20 वे शतक निर्वसाहतीकरणाचे शतक म्हणून ओळखले जाते. कारण २० व्या शतकाच्या मध्यापर्यंत  निर्वसाहतीकरणाची प्रक्रिया संपूर्ण जगात घडून आली होती.

निर्वसाहतीकरण: आशिया -

  •  युरोपातील राष्ट्रांचे आपापसातील संघर्ष, पहिले आणि दुसरे महायुद्ध तसेच वसाहतींमधील वसाहतवादविरोधी चळवळी यामुळे निर्वसाहतीकरणाला चालना मिळाली. 

  • सततच्या संघर्षामुळे तसेच युद्धामुळे युरोपीय राष्ट्र लष्करीदृष्ट्या कमकुवत बनत चालली होती.

  • या दोन महायुद्धामध्ये सर्वच युरोपीय सत्ता दुर्बळ झाल्या. 

  • या काळात पुढे आलेल्या नवीन महासत्ता अमेरिका व रशिया यांना निर्वसाहती-करणासाठी दबाव टाकायला सुरुवात केली.

  •  युनोनेदेखील तशी मागणी केली. वसाहतवादाच्या माध्यमातून वसाहतींच्या शोषणाचे समर्थन करणे वैचारिकदृष्ट्या तरी युरोपला शक्य नव्हते.

  •  त्यामुळे इंग्लंडला अमेरिकेची मदत घेण्यावाचून पर्याय नव्हता. 

  • महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखालील भारतीय स्वातंत्र्याची चळवळ कळसाला पोहोचली  होती. 

  •  इंग्लंडलादेखील वास्तव परिस्थितीची जाणीव झाली होती.

  •  त्यामुळे पहिल्या महायुद्धानंतर काही वसाहतींना अंतर्गत स्वायत्तता देण्याची प्रक्रिया सुरू झाली. 

अटलांटिक सनद -   

  • L दोन जागतिक महायुद्धानंतर जगाची रचना कशी असावी, यासंदर्भात अमेरिकेचे अध्यक्ष फ्रेंकलिन रुझवेल्ट आणि ब्रिटनचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अटलांटिक महासागरात न्यू फाउंडलँडजवळ एका बोटीवर विचार-विनिमय करून दिनांक १४ ऑगस्ट १९४१ रोजी केलेल्या संयुक्त  घोषणेला’ अटलांटिक  सनद’ म्हणतात. 

  • या सनदेमध्ये जगातील सर्व लोकांना स्वयंनिर्णयाचा व स्वराज्याचा हक्क आहे, असे म्हटले होते. 

  • युद्धानंतरच्या काळात होणारे राजकीय आणि भौगोलिक फरक स्थानिक लोकांच्या इच्छेनुसारच करण्यात  येतील. 

  • स्थानिक लोकांच्या संमतीची रीत देशांच्या सीमामध्ये फेरबदल होता कामा नये.

  •  सर्व लोकांना आपल्या पसंतीची राज्यव्यवस्था मिळाली पाहिजे.

  •  ज्यांची राज्य वा सार्वभौम अधिकार बळजबरीने नष्ट करण्यात आले, ते त्यांना परत मिळाले पाहिजे, असेही ही नमूद करण्यात आले आहे.

  •  जगातील सर्व राष्ट्रांना व्यापार क्षेत्रात समान संधी, आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्य, जगभराच्या श्रमिकांच्या राहणीमानात सुधारणा, आर्थिक समतोल  व  सामाजिक या गोष्टी साध्य झाल्या पाहिजेत.

  •  सर्व राष्ट्रातील लोक भीती व दारिद्र्य यातून मुक्त होतील आणि सागरावर मुक्तसंचार करण्याचा अधिकार सर्वांनाच मिळेल, असेही ही नमूद केले गेले.

  •  अशा प्रकारचे शांततामय वातावरण निर्माण व्हावे, अशी आशा व्यक्त करून त्यासाठी सर्व राष्ट्रांनी बळाचा वापर करण्याचे थांबवले पाहिजे, असेही आवाहन केलेले आहे.

  • महायुद्धानंतरच्या काळात निर्वसाहतीकरणाच्या  प्रक्रियेला या अटलांटिक सनद त्यामुळे नैतिक पाठबळ मिळाले.

  •  पहिल्या महायुद्धामध्ये जर्मनी व तुर्कस्तान या राष्ट्रांचा पराभव झाला.

  • या राष्ट्रांच्या वर्चस्वाखाली असणाऱ्या वसाहतींच्या शासनव्यवस्थेसाठी राष्ट्रसंघाने विश्वस्त पद्धती आणली.

  • त्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघटनेने वसाहतींसाठी एक विश्वस्त समिती स्थापन केली.

  • इंग्लंड व फ्रान्स या राष्ट्रांना विश्वस्त म्हणून कार्य करण्यास सांगितले.  

  • या समितीनुसार सभासद राष्ट्रांनी आपल्या अखत्यारीतील वसाहतीचा मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करावा. 

  • तसेच त्या वसाहतींच्या सांस्कृतिक प्रगतीकडे लक्ष देऊन तेथील प्रजेला स्वराज्यासाठी प्रशिक्षित करावे असे ठरले. 

  •  दुसऱ्या महायुद्धानंतर जपानच्या साम्राज्यविस्ताराला आळा बसताच  इंग्लंड सुद्धा आपल्या वसाहती विषयीचे धोरण  सौम्य केले.

  •  इसवी सन १९४७  मध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन देशांना स्वातंत्र्य दिले.

  •  त्यानंतर १९५६  मध्ये आफ्रिकेतील काही वसाहतींना स्वातंत्र्य दिले. 

  • भारतापाठोपाठ सायप्रस, मालटा  हे देश इसवी सन १९६०  मध्ये स्वतंत्र झाले.

  •  इ.स. १९७१ मध्ये ब्रिटनने इराणच्या आखातातून सैन्य काढून घेतले.

  •   त्याचवर्षी  सिंगापूरमधूनही इंग्लंडने  सैन्य काढून घेतले.

  •  काही वसाहतींनी  शांततामय मार्गांनी स्वातंत्र्य मिळवले. 

  • मात्र याबाबत युद्धाला तोंड द्यावे लागले, तरीसुद्धा फ्रेंच प्रभुत्वखालींल  इंडोचायना, मोरोक्को,  ट्युनिशिया, अल्जेरिया हे देश स्वतंत्र झाले

  • इसवी सन १९८०  पर्यंत जवळजवळ बहुतेक वसाहती परकीय सत्तेच्या जोखडातून मुक्त झालेल्या होत्या. 

  • २० व्या  शतकाच्या अखेरपर्यंत दक्षिण आफ्रिका स्वतंत्र झाला. 

  • वसाहतवाद संपुष्टात येऊन हळूहळू  निर्वसाहतीकरण घडून आले. हे घडून येण्यास संयुक्त राष्ट्रे ही संघटना कारणीभूत ठरली.

मालदीव -

  •  मालदीवमध्ये इ.स. १५०७ मध्ये  पोर्तुगीजांनी प्रवेश केला. 

  • तेव्हापासून  मालदीव गोव्यातील पोर्तुगीजांकडे खंडणी पाठवू लागले.

  • इ.स. १५७३ मध्ये पोर्तुगीजांची सत्ता मलबार येथील मोहम्मद ठाकूरुफानू अल आजम याने संपुष्टात आणली. 

  • सुलतान झाल्यावर त्यांनी डचांशी करार करून  या बेटांची जबाबदारी  डचांकडे सोपवली. 

  • तेव्हापासून मालदीवचा सुलतान डचांची सत्ता असणाऱ्या श्रीलंकेकडे( सिलोन) खंडणी  पाठवू लागला.

  •  त्यानंतर हा प्रदेश ब्रिटिशांनी ताब्यात घेतला. ब्रिटिशांनी येथे हवाई तळ आणि रेडिओ केंद्र उभे केले. 

  • भात शेती करण्यासाठी भारतातील मजूर ब्रिटिशांनी तेथे नेले होते.

  •  26 जुलै१९६५  रोजी कोलंबो येथे झालेल्या करारानुसार मालदीवला स्वातंत्र्य मिळाले.

श्रीलंका -

  •  ब्रिटिशांनी श्रीलंका (सिलोन) येथे इ.स.१७९८ ते १९४८  पर्यंत राज्य केले.

  • डच आणि पोर्तुगीज यांचा पराभव करून ब्रिटिशांनी श्रीलंका ताब्यात घेतले.

  •  ब्रिटिश सत्तेविरुद्ध श्रीलंकेमध्ये अनेक उठाव झाले.

  •  ब्रिटिशांनी दक्षिण भारतातून अनेक तामीळ मजूर श्रीलंकेमध्ये कॉफी लागवडीसाठी नेले होते.

  •  कॉफी, चहा, रबर आणि नारळ यांच्या उत्पादन आणि विक्रीत ब्रिटिशांनी व्यापारावर वर्चस्व मिळवले होते.

  •  कोलंबो हे जागतिक बंदर म्हणून ब्रिटिशांनी नावारूपास आणले. 

  •  ब्रिटिशांनी श्रीलंकेत महाविद्यालये, विद्यापीठे  स्थापन केली आणि आणि बौद्ध धर्माच्या अभ्यासाला प्रोत्साहन दिले

  • इ.स. १९४८ मध्ये श्रीलंका हा देश ब्रिटिश वर्चस्वातून पूर्णपणे मुक्त झाला.

म्यानमार (ब्रह्मदेश)

प्रश्न - ब्रिटिश आणि ब्रह्मदेश यांच्यात तीन युद्धे झाली. ( सकारण स्पष्ट करा)

  • इसवीसन १५९९ मध्ये पोर्तुगीजांनी म्यानमारच्या राजाचा पराभव केला.

  •  त्यानंतर इ.स.१६११ मध्ये म्यानमारमधील विविध राजघराण्यांनी एकत्र येऊन पोर्तुगिजांचा पराभव केला आणि देशाचे एकत्रीकरण केले.

  •  पुढे त्यांनी विस्तारवादाचा आश्रय घेऊन मणिपूर आणि आसपासच्या भागावर ताबा मिळवला. 

  • ब्रिटिशांच्या अमलाखालील  प्रदेशात धोका उत्पन्न झाल्यामुळे ब्रिटिश आणि म्यानमार यांच्यात युद्ध झाले. त्यांना ब्रम्ही युद्ध असे म्हणतात.

  •  इसवी सन  १८२६ च्या पहिल्या  ब्रम्ही युद्धात ब्रिटिशांनी  म्यानमारचा पराभव करून आसाम, मनिपुर ही राज्य जिंकून घेतली. 

  • तसेच दुसऱ्या  ब्रम्ही युद्धातही त्यांनी म्यानमारचा पराभव केला. 

  •  याच दरम्यान  फ्रान्सने म्यानमारमधील ‘अप्पर बर्मा’ या भागाचा ताबा घेतला.

  •  पुढे ब्रिटिशांनी संपूर्ण म्यानमार आपल्या वर्चस्वाखाली आणले.

  •  ब्रिटिशांनी म्यानमार ब्रिटिशकालीन भारताचा एक प्रांत म्हणून भारतात समाविष्ट केला.

  • त्यानंतर १९३५ च्या कायद्याने ब्रह्मदेश म्हणजेच म्यानमार भारतापासून वेगळा करण्यात आला.

  •  ब्रिटिशांनी म्यानमारला स्वयम् शासनाची मुभा दिली. १९३७ नंतर आँग सॅन यांच्या नेतृत्वाखाली बर्मी लोकांनी ‘बर्मा इंडिपेंडन्स आर्मी’  ही संघटना उभारली. 

  • त्यांनी दुसऱ्या महायुद्धकाळात जपानला मदत केली. 

  • म्यानमारमध्ये ब्रिटिशांची पीछेहाट होऊ लागली. इसवी सन १९४५  मध्ये ब्रिटिशांनी अमेरिकेच्या सहकार्याने पुन्हा म्यानमारमध्ये सत्ता मजबूत केली. 

  • देश सांभाळायचा असल्यास लोकमताकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, हे लक्षात घेऊन ब्रिटिशांनी आँग सॅन यांना उपाध्यक्ष केले.

  •  ४ जानेवारी १९४८ रोजी ब्रिटिशांनी म्यानमारला स्वातंत्र्य दिले. 

  • निर्वसाहतीकरण : आफ्रिका -

  •    इसवी सन १९५० ते १९६५  या १५ वर्षांच्या काळात आफ्रिकेतील वसाहतींनी परकीय वसाहतवाद्यांचे वर्चस्व झुगारून टाकले. 

  • युरोपीय वसाहतवादी राष्ट्रांनी लादलेली शिक्षण पद्धती परकीय होती.

  •  याच शिक्षण पद्धतीतून शिकून तयार झालेले नेते वसाहतींना लाभले होते. 

  • या शिक्षण पद्धतीमुळे अमेरिकन स्वातंत्र्यलढा, फ्रेंच राज्यक्रांती, राष्ट्रवाद यांचे ज्ञान आफ्रिकेतील लोकांना झाले होते.

  • त्यातूनच त्यांच्यामध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण झाली.

  •  दुसऱ्या महायुद्धानंतर आफ्रिकेतील राष्ट्रवादाला अधिकच चालना मिळाली.

  •  इंग्लंड व फ्रान्सने आफ्रिकन वसाहतींना हळूहळू काही अधिकार द्यायला सुरुवात केली.

  •  त्यातून स्वातंत्र्याची चळवळ अधिक तीव्र होत गेली.

  • बांडुंग परिषद

  • भारताने इ.स. १९४७ मध्ये पहिली आशियाई परिषद घेतली. 

  • त्या परिषदेत आशियातील 25 राष्ट्रांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. 

  • या परिषदेत झालेल्या चर्चेतून आशियाई प्रादेशिकतावादाची संकल्पना आकाराला आली.  

  • आशियातील जनतेचे प्रश्न, आशियाच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक समस्यांकडे लक्ष वेधणे व परस्पर सहकार्यावर भर देण्यासंबंधी विचार विनिमय झाला.

  • या पार्श्वभूमीवर इ.स. १९५५  मध्ये इंडोनेशियातील बांडुंग येथे पहिली आशियाई व आफ्रिकन राष्ट्रांची परिषद भरली. 

  • या परिषदेत आफ्रो-आशियाई जनतेच्या प्रश्नांची चर्चा, जागतिक शांततेला  प्राधान्य आणि सहकार्यावर भर देण्याचे ठरले.

आफ्रिकी ऐक्य कल्पना

  • आफ्रिकी ऐक्यचा विचार प्रथम एच. एस. विल्यम्स यांनी मांडला. 

  •  त्याने लंडनमध्ये इ.स. १९०० मध्ये पहिली अखील आफ्रिका परिषद भरवली.

  •  या परिषदेस हजर असणाऱ्या डब्ल्यू.इ. बी.दयुब्वा  या कृष्णवर्णीय नेत्याने या कल्पनेस पहिल्या महायुद्धानंतर चालना दिली. 

  • इ.स. १९१९  मध्ये पॅरिस येथे त्याने अखिल अफ्रीका ऐक्य परिषद भरवली. 

  • त्यांच्या पुढाकाराने पुढे आणखी काही परिषदा झाल्या.

  •  यातूनच ऐक्याची कल्पना लोकांच्या मनात रुजू लागली.

  •  यासंदर्भात इ.स. १९४५  मध्ये मॅंचेस्टर येथे परिषद भरली होती.

  •  या परिषदेत आफ्रिकेने  सक्रिय सहभाग घेतला.

आफ्रिकाखंडातील निर्वसाहतीकरण - 

  •  इ.स. १९१४  मध्ये पहिले महायुद्ध सुरू झाले, तेव्हा लायबेरिया आणि इथिओपिया वगळता संपूर्ण आफ्रिका खंड युरोपीय राष्ट्रांच्या सत्तेखाली होता.

  •  पहिल्या महायुद्धादरम्यान सहभागी असलेल्या राष्ट्रांच्या वसाहती आफ्रिकेत असल्याने अप्रत्यक्षरीत्या या वसाहती युद्धात ओढल्या गेल्या.

  •  पहिले महायुद्ध सुरू होताच इंग्लंड व फ्रान्स यांनी जर्मनीच्या ताब्यात असणाऱ्या आफ्रिकन वसाहती जिंकून घेण्यासाठी त्यांच्यावर हल्ले केले.

  •  महायुद्धात जर्मनीचा पराभव होताच, जेत्या राष्ट्रांना पराभूत राष्ट्रांच्या  ताब्यातील वसाहती आपल्या ताब्यात घेण्याची तीव्र इच्छा झाली.

  • अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी याप्रसंगी मांडलेली भूमिका --

  •  या  जेत्या राष्ट्रांनी विश्वस्त या नात्याने वसाहती सांभाळणे योग्य होते. 

  • वसाहतींना स्वयंनिर्णयाचा अधिकार मिळणे आवश्यक होते. 

  • राष्ट्रसंघाने परस्पर सामंजस्याने असे ठरवले की,इ.स. १९१९ मध्ये ब्रिटन, फ्रान्स व बेल्जियम या तीन राष्ट्रांनी आफ्रिकेमधील जर्मन वसाहती आपापसात विभागून घ्याव्यात. या वसाहतींचा राज्यकारभारावर देखरेख ठेवण्यासाठी राष्ट्रसंघाने ११ सभासदांचे एक स्थायी मंडळ नेमले. 

  • इसवी सन १९२० मध्ये कॅप कॉलनी, ऑरेंजफ्रीस्टेट आणि ट्रान्सवाल या चार ब्रिटिश वसाहतीचे एकत्रीकरण होऊन त्यांचे दक्षिण आफ्रिका हे राज्य निर्माण झाले.

  •  मात्र त्यांच्यावरील गोऱ्या लोकांचे वर्चस्व संपलेले नव्हते.

  •  दुसऱ्या महायुद्धाच्या अगोदर  इजिप्त स्वतंत्र झाले.

  •  त्यानंतर लिबिया, ट्युनिशिया, मोरोक्को आणि अल्जेरिया, गाना राज्यदेखील एकापाठोपाठ स्वतंत्र झाली.

  • २०  विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मध्य आफ्रिकेतील आयव्हरी कोस्ट, मादागास्कर, मालीन यासारख्या एकूण बारा फ्रेंच वसाहती देखील स्वतंत्र झाल्या.

  •  संयुक्त राष्ट्रांच्या विश्वस्त मंडळाच्या देखरेखीखालील कॅमेरून, सोमालिया इत्यादी वसाहती तसेच विविध युरोपियन राष्ट्रांच्या वर्चस्वाखाली इतर वसाहतीही स्वतंत्र झाल्या.

  •  अल्जेरिया -

  •  या सगळ्या राष्ट्रांपैकी आणि अल्जेरियाला मात्र कडवा संघर्ष करावा लागला.

  • इसवी सन १९६२ मध्ये सार्वमताच्या आधारावर अल्जेरियाला स्वातंत्र्य मिळाले.

  •  टांगानिका आणि झांझीबार यांचे  ‘टाझानिया संयुक्त प्रजासत्ताक’ या नावाने एप्रिल १९६४  मध्ये एकत्रीकरण झाले.

  •  इटली-

  •  दुसऱ्या महायुद्धाच्या अगोदरच्या काळात इटलीने इथिओपिया, लिबिया जिंकले.

  •  मुसोलिनी या इटलीच्या हुकुमशहाने लिबिया आणि इथिओपिया या प्रदेशातून इजिप्त आणि ब्रिटीश वसाहतींवर हल्ला केला होता.

  • दुसऱ्या महायुद्धात आफ्रिकेतील युद्धक्षेत्राचा विस्तार उत्तरेत मोरोक्को आणि लिबियापासून पूर्वेला इथिओपिया व सोमालीलँडपर्यंत होता.

  •  इटलीमुळे आणि जर्मन सेनापती रोमेन  याच्या चढाईमुळे ब्रिटिशांच्या आफ्रिकेतील साम्राज्याला धोका निर्माण झाला.

  •  यावेळी ब्रिटीश सैन्यात सामील असणाऱ्या भारतीय सैनिकांनी पराक्रमाची शर्थ केली.

  •  त्यामुळे ब्रिटिश सैन्याने आफ्रिकेत इटली आणि जर्मनीच्या संयुक्त फौजांना मागे हटवले.

  •  इसवी सन १९४५  मध्ये महायुद्ध संपताच जर्मनी आणि इथलीच आफ्रिकेतील आपल्या वसाहती गमवाव्या लागल्या.

  •  निर्वसाहतीकरणास वेग -

  •  दुसरे महायुद्ध संपताच निर्वसाहतीकरणास अधिकच वेग आला.

  •  अशिया आणि आफ्रिका खंडात स्वातंत्र्य चळवळीचे वारे वेगाने वाहू लागले.  

  • या दोन्ही खंडातील देशांत मध्ये राष्ट्रीय भावना जागृत होऊन स्वयम् शासनाची मागणी पुढे येऊ लागली होती.

  •  याच सुमारास अनेक विचारवंत वसाहतवाद ही संकल्पनाच मुळी अन्यायकारक आहे, असे मत प्रतिपादन करू लागले होते.

  •  त्यामुळे काळाच्या ओघात या दोनही खंडातील अनेक देश स्वतंत्र झाले.

  •  या राष्ट्रांकडे अमेरिका आणि रशिया या देशांचे लक्ष होतेच.

  •  यानंतर मात्र नव्याने स्वतंत्र झालेल्या या राष्ट्रांना आपल्या गटात सामील करून घेण्याची स्पर्धा महासत्तांमध्ये सुरू झाली. 


टिप्पण्या